कृषी, व्यापार आणि वित्तीय सेवा क्षेत्रात नोकरीच्या संधी!

    15-Jul-2024
Total Views | 33
rbi report employment grew


मुंबई :     
 सन २०२२-२३ वर्षात कृषी, व्यापार आणि वित्तीय सेवांसह एकूण २७ क्षेत्रांमध्ये रोजगारनिर्मितीत वाढ दिसून आली आहे. गेल्या वर्षी विविध सेवा क्षेत्रात ३.३१ टक्के वाढीसह एकूण ५९.६६ कोटी इतकी नोकऱ्यांत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, २७ क्षेत्रात ५७.७५ कोटी इतकी रोजगाराची नोंद करण्यात आली आहे.




दरम्यान, २०२२-२३ मध्ये कृषी, व्यापार आणि वित्तीय सेवांसह २७ क्षेत्रांमध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तींची संख्या वार्षिक ३.३१ टक्क्यांनी वाढून ५९.६६ कोटी झाली आहे. आरबीआयने दि. ०८ जुलै रोजी प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, २०२१-२२ दरम्यान विविध क्षेत्रातील रोजगार वाढ दिसून आली आहे. गेल्या आठवड्यात सिटीबँकच्या अहवालात म्हटले आहे की, जवळपास ७ टक्क्यांच्या वाढीमुळे देशात केवळ ८-९ दशलक्ष रोजगार निर्माण होतील, जे ११-१२ दशलक्ष आवश्यक असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात देशात ४.६७ कोटी नोकऱ्यांची भर पडली आहे. तसेच, २०२३-२४ मध्ये रोजगार वाढीचा दर ६ टक्के होता तर वर्ष २०२२-२३ मध्ये ३.२ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. यामध्ये अहवालात नोंदविलेल्या आकडेवारीत १९८०-८१ ते २०२२-२३ या कालावधीत समाविष्ट असलेल्या २७ उद्योगांसाठी उत्पादनक्षमता यांचा समावेश करण्यात आला आहे.





अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई मेट्रो-३

मुंबई मेट्रो-३ 'बीकेसी ते आचार्य अत्रे' मार्गाचे लोकार्पण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे' मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी अशा टप्पा २ अच्या संचलनाची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे. या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)कडून टप्पा २ अ ला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार, आज दि.९ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो ३च्या या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री बीकेसी ते सिद्धिविनायक मंदिर स्थानकापर्यंत मेट्रोने ..

मसूद अजहरचा भाऊ जैशचा दहशतवादी अब्दुल रौफ अझहर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार!

मसूद अजहरचा भाऊ जैशचा दहशतवादी अब्दुल रौफ अझहर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार!

पहलगाम हल्ल्या नंतर भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांना जबरदस्त उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्ण केले. दि. ७ मे रोजी रात्री १ वाजून ४ मिनिटांनी ते दीड वाजताच्या दरम्यान ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाले. भारतीय दलांनी पाकिस्तानमध्ये बहावलपूर आणि मुरीदके येथे हल्ले केले आणि जैश आणि लष्करचे मुख्यालय उद्ध्वस्त केले. कित्येक वर्षांपासून या दोन्ही दहशतवादी संघटना सातत्याने भारताविरोधात कारवाया करत आहेत. हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद प्रमूख मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रौफ अझहर जो जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल प्रमुख आणि आयसी-८१४ अपहरणाचा मास्टरमाइ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121