पवारांच्या भेटीत काय घडलं? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

    15-Jul-2024
Total Views | 57
 
Bhujbal
 
मुंबई : मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर या भेटीमागचं कारण उघड केलं आहे. राज्यातील समाजासमाजात तेढ निर्माण झाल्याने स्फोटक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नात शरद पवारांनी लक्ष घालावं, अशी विनंती केल्याचे भुजबळांनी म्हटले आहे.
 
छगन भुजबळ म्हणाले की, "आम्ही जवळपास दीड तास चर्चा केली. मी कुठलाही मंत्री, आमदार किंवा कुठलीही पक्षीय भुमिका घेऊन आलेलो नाही, असं मी त्यांना सांगितलं. तुम्ही महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम राबवलं आणि आता राज्यात काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे राज्यात शांतता निर्माण व्हायला हवी ही एक जेष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देत असताना असाच मराठवाडा पेटला होता. त्यावेळी तुम्ही तो शांत केला, याची त्यांना आठवण करुन दिली. पण आज अशी परिस्थिती असताना तुम्ही आला नाहीत," असे त्यांनी सांगितले.
 
हे वाचलंत का? -  भूजबळ-पवारांच्या भेटीवर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले...
 
"यावर शरद पवारांचं म्हणणं होतं की, जरांगेंना भेटल्यावर मुख्यमंत्र्यांनी काय चर्चा केली, कोणती आश्वासने दिली, हे आम्हाला माहिती नाही. तुम्ही ओबीसी नेत्यांचं उपोषण सोडायला गेल्यावर तुम्ही त्यांना काय सांगितलं हेसुद्घा आम्हाला माहिती नाही," असं पवारांचं म्हणणं असल्याचं भुजबळांनी सांगितलं.
 
ते पुढे म्हणाले की, "तुम्ही राज्यातले सर्वात जेष्ठ नेते असल्याने गावागावांमध्ये सर्व समाजघटकांची काय परिस्थिती आहे, याचा तुम्हाला सर्वात जास्त अभ्यास आहे. त्यामुळे तुम्ही यात पुढाकार घ्यायला हवा," अशी विनंती केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, एक दोन दिवसांत मी मुख्यमंत्री शिंदेंशी बोलतो आणि २-४ लोकं एकत्र बसून हा प्रश्न कसा सोडवता येईल, यावर चर्चा करायला मी तयार आहे, असे आश्वासन शरद पवारांनी भुजबळांना दिले आहे.
 
"ओबीसी आणि मराठ्यांचा प्रश्न सुटावा आणि तंग झालेलं वातावरण शांत व्हावं, हा माझा हेतू आहे. यासाठी मी कुणालाही भेटायला तयार आहे. उद्या मी राहुल गांधी आणि पंतप्रधानांनासुद्धा भेटायला तयार आहे. परंतू, राज्यातील वातावरण शांत असावं, गोरगरिबांची घरं पेटता कामा नये, हा माझा यामागे हेतू आहे. यामध्ये कुठलंही राजकारण नाही. यावेळी धनगरांच्या प्रश्नावरही चर्चा झाली असून ते सर्वांसोबत चर्चा करायला तयार झाले आहेत," असेही भुजबळांनी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

'सनम तेरी कसम’चे दिग्दर्शक राधिका राव आणि विनय सप्रू यांचा स्पष्ट संदेश,''भारतीय प्लॅटफॉर्मने पाकिस्तानी कलाकारांशी कोणताही संबंध ठेवू नये'' सविस्तर वाचा...

अभिनेता हर्षवर्धन राणेने नुकतीच एक ठाम भूमिका घेतली जर सनम तेरी कसम या चित्रपटाचा सिक्वेल (भाग २) तयार झाला आणि त्यात पुन्हा पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन सहभागी झाली, तर तो स्वतः त्यात काम करणार नाही. या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आता चित्रपटाचे दिग्दर्शक राधिका राव आणि विनय सप्रू यांनीही पाकिस्तानातील कलाकारांवर कठोर शब्दांत टीका केली आहे आणि भारतीय प्लॅटफॉर्म्सने त्यांच्याशी कोणताही व्यावसायिक संबंध ठेवू नये, असे म्हटले आहे...

IPL सामना अनपेक्षितपणे रद्द; प्रिटी झिंटाकडून चाहत्यांची माफी धर्मशाळा स्टेडियममध्ये काय घडलं?

IPL सामना अनपेक्षितपणे रद्द; प्रिटी झिंटाकडून चाहत्यांची माफी धर्मशाळा स्टेडियममध्ये काय घडलं?

हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील HPCA (हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन) स्टेडियममध्ये गुरुवारी एक अनपेक्षित घटना घडली. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू असलेला IPL सामना अवघ्या 10.1 षटकांतच अचानक थांबवण्यात आला. यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित असलेले हजारो प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र या सगळ्या परिस्थितीत अभिनेता आणि पंजाब किंग्जची सह-मालक प्रिटी झिंटा हिने मोठ्या संयमाने आणि जबाबदारीने परिस्थिती हाताळली. यानंतर तिने सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहून आपल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121