वरळी हिट अँड रन प्रकरण : पीडित कुटुंबाला मुख्यमंत्र्यांकडून १० लाखांची मदत

    11-Jul-2024
Total Views | 20
 
Shinde
 
मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणात जीव गमवावा लागलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटुंबियांना विशेष बाब म्हणून १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार, दि. १० जुलै रोजी केली. या प्रकरणात नाखवा कुटूंबाचे झालेले नुकसान कधीही भरून येणारे नसल्याने मानवतेच्या दृष्टीकोनातून ही मदत जाहीर केली असल्याचे त्यांनी सांगितले.
 
वरळी येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शहा याला क्राईम ब्रँचने अटक केल्यानंतर त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला. त्यावर स्पष्टीकरण देताना, या प्रकरणात कोण कितीही मोठा असला, तरीही त्याला पाठीशी घातले जाणार नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. हे प्रकरण घडल्यानंतर पहिल्याच दिवशी आपण पोलिसांना आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते, त्यावर आपण ठाम आहोत, असेही शिंदे म्हणाले. तसेच या घटनेनंतर आज राजेश शहा यांना पक्षातून पदमुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.
 
'त्या' मद्यालयांवर कारवाई!
 
मुंबई आणि इतर शहरात हिट अँड रन प्रकरणे वाढत असल्याने शहरातील बार, पब आणि मद्यविक्रीच्या दुकानांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच रात्री उशिरापर्यंत बार चालू ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच अनधिकृतपणे चालणारे बार आणि पब जमीनदोस्त करण्याचे निर्देश आपण संबंधित मनपा आयुक्तांना दिले असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. या प्रकरणांना आळा बसावा यासाठी ड्रिंक आणि ड्राइव्हची तपासणी आणि गस्त वाढवण्याचे निर्देशही ठाणे, पुणे, मुंबई पोलीस आयुक्तांना दिले असून ड्रिंक अँड ड्राइव्हच्या प्रकरणात कितीही मोठी व्यक्ती गुंतलेली असली तरीही तिला पाठीशी घातले जाणार नाही याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना केला.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121