पवई तलावातून झाली मगरीच्या पिल्लाची तस्करी; वन विभागाकडून कारवाई

    10-Jul-2024
Total Views | 832
powai crocodile



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
वन विभागाने पवई येथे मगरीच्या पिल्लाची तस्करी करू पाहणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे (powai crocodile). बुधवार, दि. १० जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली (powai crocodile). आय.आय.टी पवई परिसरात हा आरोपी मगरीच्या पिल्लाची विक्री करण्यासाठी आला होता. (powai crocodile)
 
 
पवई तलावात मोठ्या संख्येने मगरींचा अधिवास आहे. याठिकाणी मगरींचे नैसर्गिक प्रजनन देखील होते. यामधूनच जन्मास आलेल्या पिल्लाची तस्करी होत असल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. जोगेश्वरी लिंक रोडवर आय.आय.टी पवईच्या मार्केट गेट समोर एक व्यक्ती मगरीच्या पिल्लाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी वनकर्मचाऱ्यांनी 'डब्लूडब्लूए' स्वयंसेवकांसोबत त्याठिकाणी सापळा लावला. यावेळी बनावट ग्राहक तयार करण्यात आला. या बनावट ग्राहकाला मगरीचे पिल्लू विकण्यासाठी यश पारगावरकर नामक तरुण त्याठिकाणी आला. त्यावेळी लपलेले वनकर्मचारी आणि संस्थेच्या इतर स्वयंसेवकांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तपासणीअंती त्याच्याजवळ मगरीचे एक पिल्लू आढळून आले. आरोपी यश हा महात्मा ज्योतीबा फुले नगर येथील राजरत्न चाळीमध्ये राहणारा रहिवाशी आहे.
 
 
 
या कारवाईमधून मगरीचे एक पिल्लू ताब्यात घेण्यात आले असले तरी, या भागात मगरीच्या पिल्लांची तस्करी सुरू असल्याचे समोर आले आहे. एका वनकर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, येथील स्थानिक सर्पमित्राने मगरीचे हे पिल्लू यशला विकण्यासाठी दिले होते. अजून एका स्थानिक सर्पमित्राने पवई तलावामधून मगरीची पिल्लं पकडली होती. त्यामधील काही पिल्लं ही नाशिकमध्ये विकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही स्थानिक सर्पमित्र सध्या फरार आहेत. वन विभाग त्यांच्या मागावर आहे. ही कारवाई वनक्षेत्रपाल राकेश भोईर, मानद वन्यजीव रक्षक, ठाणे रोहित मोहिते, वनपाला संदीप यमगर, वनरक्षक मिताली महाले, राम केंद्रे यांनी केली.


अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121