“भारतीय चित्रपटसृष्टीचे आधुनिक भविष्य पाहणारे...”, रामोजी राव यांच्या निधनाने पंतप्रधान मोदीही भावूक

    08-Jun-2024
Total Views | 43
 
pm modi
 
 
मुंबई : रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे ८ जून २०२४ रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपुर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कलाकारांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रामोजी यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला असून त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो असे त्यांनी म्हटले आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “रामोजी राव यांच्या निधनाचे वृत्त ऐकून फार दु:ख झाले. भारतीय चित्रपटसृष्टीचे निराळे आणि आधुनिक भवितव्य पाहणारे रामोजी राव होते. पत्रकारिता आणि चित्रपट क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. देशाच्या प्रगतीसाठी रामोजी राव हे फार सक्रियपणे काम करत होते. मी स्वतःला भाग्यवान समजतो की रामोजी राव यांच्याशी चर्चा करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या निधनाचं वृत्त क्लेशदायक आहे. त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो”, या आशयाची पोस्ट नरेंद्र मोदींनी केली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

(Tahawwur Rana's NIA Interrogation Begins) २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. गुरुवारी १० एप्रिलला रात्री राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाची १८ दिवसांची कोठडी दिली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता एनआयए मुख्यालयात चौकशीला सुरुवात झाली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121