"देवेंद्र फडणवीस हा पळणारा नव्हे तर लढणारा व्यक्ती!"

    08-Jun-2024
Total Views | 72
 
Fadanvis
 
मुंबई : देवेंद्र फडणवीस पळणारा नाही तर लढणारा व्यक्ती आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. शनिवारी दादर येथील भाजपच्या कार्यालयात विधिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "यशाचे बाप अनेक असतात. पण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असतं, ते पचवायचं असतं आणि नवीन निर्धार करायचा असतो. या निवडणूकीत मी भाजपचं नेतृत्व केल्याने या अपयशाची जबाबदारी मी स्विकाली. त्यामुळे मला मोकळं करून काम करण्याची संधी द्या, असं मी सांगितलं. पण तेव्हा मी ते निराशेतून बोललो नाही. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही. हा लढणारा व्यक्ती आहे. चारही बाजूने घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर पुन्हा ताकदीने मैदानात उतरून सर्व किल्ले जिंकणारे छत्रपती शिवराय हे आमची प्रेरणा आहेत. त्यामुळे कुणाला वाटलं असेल की, मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो, तर ते सत्य नाही."
 
हे वाचलंत का? - "मुल्ला मौलवींना पैसे वाटून ठाकरेंनी मतं मिळवली!"
 
"माझ्या डोक्यात काही स्ट्रॅटेजी होती. मी अमित शाहांना भेटून आलो आणि त्यांना माझ्या डोक्यात काय आहे ते सांगून आलो. पण त्यांनी मला सांगितलं की, सध्या हे सगळं काम चालूद्या. आपण नंतर आपण महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट तयार करू. त्यामुळे मी कुठल्याही परिस्थिती शांत बसणार नव्हतो. मी काम करणारच आहे," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "काही लोकं विजयाचा नरेटिव्ह तयार करतात. पण त्यांची बोलती बंद झाली आहे. त्यांना तीन निवडणूका मिळून जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या एकाच निवडणूकीत भाजपला मिळाल्या आहेत. अख्ख्या इंडी आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा भाजपला मिळाल्या आहेत," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121