पराभव पचवता येईना! बैठकीतच काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या हाणामारीला सुरुवात!

    08-Jun-2024
Total Views | 223
Congress workers clash in Thrissur

नवी दिल्ली :
केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा पहिल्यांदा विजय झाला. ज्यामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. याबाबत दि. ७ जून २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जिल्हा कार्यालयात काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाथा-बुक्यांनी मारले. मुळात पराभवाचे खापर एकमेंकावर फोडल्यामुळे ही हाणामारी झाले.

याप्रकरणी पोलिसांनी एकूण २० काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांविरोधात एफआयआर नोंदवून तपास सुरु केला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा काँग्रेस कार्यालयात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाध्यक्ष जोशे वल्लूर, सरचिटणीस संजीवन कुरीचिरा यांचीही उपस्थिती होती.



 
संभाषणादरम्यान कुरीचिरा यांनी काँग्रेसच्या पराभवासाठी जोशे वल्लूर आणि काँग्रेसचे माजी खासदार टीएन प्रतापन यांना जबाबदार धरले. त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे जिल्हाध्यक्ष जोसे वल्लूर व त्यांचे समर्थक संतप्त झाले. या सर्वांनी एकत्र येत जिल्हा सरचिटणीस संजीवन यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान काहींनी संजीवन यांना मारहाणीपासून वाचवले. यावेळी काही व्यक्तींनी या घटनेचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर टाकला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
त्यानंतर संजीवन यांनी पोलिस ठाण्यात जाऊन जोशी जोशे वल्लरू आणि त्यांच्या १९ साथीदारांविरुद्ध एफआयआर दाखल केला. हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध जामीनपात्र कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

त्रिशूर लोकसभा मतदारसंघात भाजपने प्रथमच काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. भाजपचे सुरेश गोपी यांनी त्यांचे विरोधक कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार सुनील कुमार यांचा ७४,००० मतांनी पराभव केला आहे. काँग्रेसचे उमेदवार के. मुरलीधरन येथे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना एकूण ३ लाख २८ हजार १२४ मते मिळाली. या पराभवानंतर काँग्रेसच्या उमेदवाराला राजकीय जीवनातून निवृत्ती जाहिर करण्यात आली आहे.

 
अग्रलेख
जरुर वाचा
वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची 'ममता', मिथून चक्रवर्तींचा हल्लाबोल

Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी बारताच्या संविधानाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121