यश-अपयश ही सामूहिक जबाबदारी, आम्ही पराभवाने खचून जाणारे नाहीत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    06-Jun-2024
Total Views | 58

Eknath Shinde 
 
नवी दिल्ली : आपण एक टीम म्हणून काम करतो. त्यामुळे यश अपयश ही सामूहिक जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. "महाराष्ट्रात भाजपला जो पराभव सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी मी स्विकारतो आहे. मला सरकारमधून मोकळं करावं. मला फक्त पक्षाचं काम करायचं आहे," अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पक्ष नेतृत्वाकडे केली. यावर आता मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली.
 
लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) बुधवारी दिल्लीत बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "देवेंद्रजींशी माझं बोलणं झालं. आपण एक टीम म्हणून काम करतो त्यामुळे यश अपयश ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आम्ही पराभवाने खचून जाणारे कार्यकर्ते नाहीत," असे त्यांना सांगितल्याचे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "या निवडणूकीत विरोधी पक्षांकडून आरक्षण जाणार, संविधान बदलणार असे नरेटिव्ह तयार करण्यात आले. भीती निर्माण करुन त्यांना मतं मिळाली असून त्यांचा संभ्रम नक्की दूर होईल. ज्यांनी हा संभ्रम पसरवला आहे त्यांचे खरे चेहरे लोकांसमोर येतील. आपण एक टीमवर्क म्हणून काम केलं आहे आणि यापुढेही करणार आहोत, असे फडणवीसांना सांगितले असल्याचेही शिंदेंनी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

'या'देशातील मुस्लिमांना हजयात्रा करता येणार नाही, भारतासोबत १४ देशातील नागरिकांच्या व्हिसांवर बंदी

Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही...

कंपनीतील कर्मचार्‍यांना कुत्र्याप्रमाणे रांगायला, जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडलं; काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

कंपनीतील कर्मचार्‍यांना कुत्र्याप्रमाणे रांगायला, जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडलं; काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

Kerala Firm Viral Video : एका खाजगी कंपनीतील बॅासने कर्मचाऱ्यांसोबत अमानुष वागणूक केल्याचा संतापजनक प्रकार केरळमधून समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दोरीने बांधलेल्या गळ्यात पट्टा लावलेल्या कुत्र्यांप्रमाणे रांगायला लावल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असून संबंधित बॉसवर कडक कारवाईची मागणी होत आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कामगार मंत्रालयाने याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता हा कथित व्हिडिओ ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121