"शेतकऱ्यांना कर्ज नाकाराल तर..."; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा बँकांना इशारा

    25-Jun-2024
Total Views | 46
 
Devendra Fadanvis
 
मुंबई : शेतकऱ्यांना कर्ज नाकाराल तर एफआयआर दाखल करणार, असा थेट इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बँकांना दिला आहे. मंगळवारी राज्यस्तरीय बँकर्स समितीसोबत राज्य सरकारची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या दोन बैठका झाल्या. एक राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक होती आणि दुसरी खरीपपूर्व हंगाम बैठक होती. या दोन्ही बैठकांमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे. विशेषत: आज आम्ही रिजर्व बँकेच्या प्रतिनिधींना सांगितलं की, तुम्ही प्रत्येकवेळी बैठकीत सांगता की, आम्ही शेतकऱ्यांवर सीबीलची अट लागू करणार नाही. पण त्यांना ती अट लागू करून कर्ज नाकारता. हे आता खपवून घेतलं जाणार नाही. जे बैठकीत सांगता तेच बँकेने पाळायला हवं. जर बँका सीबीलची अट टाकणार असतील तर आम्ही त्यांच्यावर एफआयआर दाखल करू, असं स्पष्टपणे त्यांना सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात येत असलेल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे," असे त्यांनी सांगितले.
  
हे वाचलंत का? -  विधानसभेवर महायूतीचाच झेंडा फडकणार; प्रविण दरेकरांचा विश्वास
 
ते पुढे म्हणाले की, "खरीपपूर्व हंगामाच्या बैठकीत बियाण्यांची आणि खतांची उपलब्धता याबाबत आढावा घेतला. विशेषत: यावेळी डीएपीचा वापर कमी होऊन नॅनो युरियाचा वापर वाढायला हवा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांना पुर्णपणे पीकविमा मिळायला हवा, याबद्दलचा आढावा घेतला आहे," असेही त्यांनी सांगितले.
 
ड्रग्ज प्रकरणावर विरोधकांनी राजकारण करू नये!
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "विरोधकांनी काहीही केलं नाही. त्यांच्या राज्यात पोलिस विभागाचे कसे धिंडवडे निघाले आणि १०० कोटी रुपयांची वसूली कशी झाली हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. देशभरात आमची शून्य सहिष्णुतेची पॉलिसी आहे. आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रित काम करत आहे. ड्रग्जसंबंधी प्रकरणामध्ये राज्य सरकार कारवाई करत आहे आणि अजून बराच काळ ही कारवाई करावी लागणार आहे. यामध्ये जो कुणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. त्यामुळे विरोधकांनी याचं राजकारण करु नये. त्यांना राजकारण करायचंच असेल तर त्यांच्या अडीच वर्षात काय घडलं ती प्रत्येक गोष्ट मला सांगावी लागेल. परंतू, माझ्यासाठी हा प्रश्न कुठल्याही राजकारणाच्या पलिकडचा आहे. त्यामुळे यावर कुठलंही राजकारण करु नये," असे ते म्हणाले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
फक्त एक तास द्या वक्फ सुधारित कायद्यात..., ओवैसींच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने तोडले अकलेचे तारे

"फक्त एक तास द्या वक्फ सुधारित कायद्यात...", ओवैसींच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने तोडले अकलेचे तारे

Imran Masood एमआयएमचे नेते असिदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी एका सभेतून केवळ १५ मिनिटे द्या आम्ही काय करतो पाहा, असे देश विघातक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता संसदेत नुकतेच वक्फ सुधारित कायद्याला मंजूरी देण्यात आली. त्याविरोधात मु्स्लिम समाज आंदोलन करत आहे. याचपार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने वक्फ सुधारणा कायद्याबाबत मोठे विधान केले आहे. आम्ही सत्तेत आलो तर एका तासात वक्फ कायद्यात बदल करणार असल्याची धमकी वजा इशारा दिले आहे. ते हैदराबादमध्ये १३ एप्रिल रोजी मुस्लिम मिल्ली काउन्सिल..

ममता बॅनर्जी अधुनिक जिना, भाजप नेते तरुण चुघ यांची ममता सरकारवर बोचरी टीका! पश्चिम बंगालमध्ये वक्फ विरोधात हिंसक परिस्थिती कायम

ममता बॅनर्जी अधुनिक जिना, भाजप नेते तरुण चुघ यांची ममता सरकारवर बोचरी टीका! पश्चिम बंगालमध्ये वक्फ विरोधात हिंसक परिस्थिती कायम

Mamata Banerjee "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आधुनिक जिना म्हणून कार्यरत आहेत. जिना जे काम करत होते आता तेच काम ममता बॅनर्जी करत आहेत. मुर्शिदाबादमध्ये घडलेल्या घटना या १९४० सालतील मुस्लिम लीग कृतीप्रमाणेच घडताना दिसतात", अशी बोचरी टीका भाजप नेते तरुण चुघ यांनी १३ एप्रिल रोजी रविवारी प्रसारमाध्यमाशी बोलताना केली आहे. वक्फ सुधारित विधेयकावरून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ममता सरकार सपशेल अयशस्वी ठरले आहे...

कल्याणमधील आरोपी विशाल गवळी याची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील आरोपी विशाल गवळी याची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने रविवारी सकाळी तळोजा कारागृहात आत्महत्या केली आहे. या प्रकरणात आरोपी विशाल याला अटक झाल्यापासूनच समाजातील सर्वच स्तरातून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात होती. परंतु आज विशालच्या आत्महत्येमुळे पिडीतेला नैसर्गिकरित्या न्याय मिळाला आहे असे म्हणत समाजाच्या विविध स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे . पिडीतेला न्याय मिळाला असला तरी कायद्याने त्याला फाशी झाली असती तर इतरांवर कायद्यांचा धाक राहिला असता असे सर्वच स्तरातून बोलले जात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121