गडचिरोली पोलिसांनी माओवादाचं कंबरडं मोडलं : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    24-Jun-2024
Total Views | 23

Fadanvis
 
गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी माओवादाचं कंबरडं मोडलं असून माओवाद आता संपण्याच्या मार्गावर आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. गडचिरोलीतील जहाल माओवादी आणि जिल्ह्यातील नक्षली चळवळीचा मोर्‍हक्या समजल्या जाणार्‍या गिरधरने शनिवार, २२ जून रोजी पत्नीसह उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. दरम्यान, गडचिरोली जिल्हा पोलिस मुख्यालयात आयोजित 'माओवादी आत्मसमर्पण आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद' कार्यक्रमात ते बोलत होते.
 
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नक्षलवादविरोधी अभियानात, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या C-60 दलातील अधिकारी आणि कमांडोंचा सत्कार करून त्यांना प्रशस्तीपत्रके देण्यात आली. तसेच त्यांनी जिवावर उदार होऊन नक्षलींचा खात्मा करणाऱ्या या 'C-60 यूनिट'चे अभिनंदन केले. C-60 यूनिट आणि गडचिरोली पोलिसांनी सातत्याने शौर्य दाखविले असून महाराष्ट्राला त्या सर्वांचा अभिमान आहे, असे ते म्हणाले.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गडचिरोली पोलिसांनी सर्वप्रकारे मुकाबला करत माओवादाचं कंबरडं मोडलं आहे. पोलीस हे एक शिस्तबद्ध दल आहे. त्या शिस्तीसोबत जेव्हा एक संवेदना तयार होते, त्यावेळी शिस्त आणि संवेदना मिळून सामान्य माणसाच्या मनात खर्‍या अर्थाने आदराची भावना निर्माण होते. यामुळेच मोठ-मोठ्या माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. ज्यांच्यावर २५ लाखांचा इनाम होता, आज त्यांनाच शासनाने २५ लाख रुपयांची मदत केली आहे. पोलिसांच्या याच यशामुळे आणि शासनाच्या विविध योजनांमुळे गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवाद हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

'या'देशातील मुस्लिमांना हजयात्रा करता येणार नाही, भारतासोबत १४ देशातील नागरिकांच्या व्हिसांवर बंदी

Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही...

कंपनीतील कर्मचार्‍यांना कुत्र्याप्रमाणे रांगायला, जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडलं; काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

कंपनीतील कर्मचार्‍यांना कुत्र्याप्रमाणे रांगायला, जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडलं; काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

Kerala Firm Viral Video : एका खाजगी कंपनीतील बॅासने कर्मचाऱ्यांसोबत अमानुष वागणूक केल्याचा संतापजनक प्रकार केरळमधून समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दोरीने बांधलेल्या गळ्यात पट्टा लावलेल्या कुत्र्यांप्रमाणे रांगायला लावल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असून संबंधित बॉसवर कडक कारवाईची मागणी होत आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कामगार मंत्रालयाने याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता हा कथित व्हिडिओ ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121