"मविआ म्हणजे खोटं नरेटिव्ह पसरवण्याची कोटा फॅक्टरी!"

केशव उपाध्ये यांचा टोला

    17-Jun-2024
Total Views | 79
 
MVA
 
मुंबई : महाविकास आघाडी म्हणजे खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याची कोटा फॅक्टरी आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. शिवसनेचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या विजयावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. यावर आता केशव उपाध्येंनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
 
 
 
केशव उपाध्ये म्हणाले की, "महाविकास आघाडीला पराजय पत्करता येत नाही हे वारंवार दिसून येत आहे. लोकसभा निकालांआधी तर रेटून खोट बोलण्याची स्पर्धा या आघाडीत होतीच, पण आता निकालानंतर त्यात वाढच झाली आहे. निती आयोगाकडून महाराष्ट्राला कमी निधी आणी बोर्डाला १० कोटींचा निधी या दोन्ही खोट्या नॅरेटिवनंतर आता म्हणजे ईव्हीएमला मोबाईल जोडण्याची नवीन स्कीम त्यांनी सुरु केली आहे," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "वायकरांच्या माणसाने ईव्हीएमला जोडला असणारा मोबाईल वापरला, असं ते म्हणतात. मग शेजारच्या मतदारसंघात काँग्रेस विजयी झाली तिथे ईव्हीएममध्ये दोष नाही आणि इथे दोष आहे का? लोकांना किती मुर्ख समजाल? निवडणूक आयोगापासून ते सर्वोच्च न्यायालयात वारंवार आपटूनही तोच खोटेपणा किती काळ पसरवणार?" असा सवाल त्यांनी विरोधकांना केला आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121