रितेश-सोनाक्षीसोबत मथुरेतील भूत करणार धम्माल, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणाले...

Total Views | 37
 
film
 
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ हा हिंदी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. ७ जून २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत ३० कोटींच्या पुढे यशस्वी कमाई केली आहे. हिंदीतील पहिलाच हॉरर-कॉमेडी सुपरहिट झाल्यानंतर आदित्य सरपोतदार आणखी एक हॉरर-कॉमेडी चित्रपट भेटीला घेऊन येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा आदित्य आणि रितेश देशमुख यांची जोडी जमणार असे म्हटले जात होते आता त्यांच्या या आगामी चित्रपटावर आदित्य सरपोतदार यांनी ‘दै. मुंबई तरुण भारत’शी बोलताना शिक्कामोर्तब केला आहे.
 
आदित्य सरपोतदार यांचे आगामी हिंदी चित्रपट लवकरच येणार असून त्यापैकी एका चित्रपटाबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, “अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्यासोबत 'काकूडा' हा चित्रपट मी दिग्दर्शित केला असून ओटीटीवर लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'काकूडा' हा चित्रपटही हॉरर-कॉमेडी असून ही कथा मथुरेतील एका गावाची आहे. त्या गावात एक भूत आहे ज्याला काकूडा म्हटलं जातं. तर ती कथा या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे”.
 
दरम्यान, ‘मुंज्या’ या चित्रपटात अभय वर्मा, शर्वरी वाघ, सुहास जोशी, भाग्यश्री लिमये, मोना सिंग, अजय पुरकर यांच्या महत्वपुर्ण भूमिका आहेत. कोकणातील चेटुकवाडीतील ही काल्पनिक कथा ‘मुंज्या’ या चित्रपटातून फार उत्तमरित्या मांडली आहे.
 
 
 

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. 
अग्रलेख
जरुर वाचा
भारताचा आर्थिक कायापालट : निर्णायक नेतृत्वाने घडवलेले नवे पर्व

भारताचा आर्थिक कायापालट : निर्णायक नेतृत्वाने घडवलेले नवे पर्व

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (खचऋ) एप्रिल 2025च्या ताज्या अहवालाने प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची आणि आत्मविश्वासाची एक नवी ज्योत प्रज्वलित केली आहे. या अहवालानुसार, भारताने 4.187 ट्रिलियन डॉलर्सच्या सकल राष्ट्रीय उत्पादनासह (ॠऊझ) जपानसारख्या विकसित अर्थव्यवस्थेला मागे टाकत, आज जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले नाव कोरले आहे. हे ऐतिहासिक यश म्हणजे, केवळ आकड्यांचा खेळ नसून, ते एका दूरदर्शी नेतृत्वाने, दृढ राजकीय इच्छाशक्तीने आणि सव्वाशे कोटी भारतीयांच्या एकत्रित प्रयत्नांनी गेल्या दशकात ..

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश

(CM Devendra Fadnavis Reviews Maharashtra Security Amid India-Pak Tensions)भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ९ मे रोजी राज्यातील एकूण सुरक्षा व्यवस्थेचा आणि आपत्कालीन तयारीचा सखोल आढावा घेतला. मुंबईतील वर्षा निवासस्थानी घेतलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत राज्याच्या गृह, आरोग्य, पोलिस, प्रशासन, आणि महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चा झाली. संभाव्य संकट परिस्थितीत नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा धोका कमी करणे आणि प्रशासन सज्ज ठेवणे यावर भर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121