एअर इंडियाने २५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले म्हणाले.....

एअर इंडियाकडून पुन्हा सेवा सुरळीत झाल्याचे आश्वासन

    09-May-2024
Total Views | 109

Air India
 
 
मुंबई: एअर इंडिया कंपनीने अखेर २५ कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. त्यांच्या 'बेजबाबदार ' वर्तनामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. मंगळवारी व बुधवारी हजारो प्रवाशांना शेकडो विमाने रद्द झाल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागले होते. अचानक अनेक कर्मचारी यांनी 'सिक लिव' (आजारी रजा) घेत सामुहिक रजा घेतली होती.
 
कुठलीही पूर्वसूचना न देता कर्मचाऱ्यांनी ही रजा घेतल्यामुळे एअर इंडियाने अनेक विमाने रद्द करण्याचा निर्णय घेतला घेतला होता. त्याचा मनस्ताप प्रवाशांना झाला. या कर्मचाऱ्यांनी नोकरीच्या अटी शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. एअर इंडिया कंपनीने ही मोठी कारवाई करत २५ जणांना काढून टाकले आहे.
 
या प्रकारानंतर तब्बल ९५ विमाने रद्दबादल करण्यात आली होती. याबद्दल व्यक्त होताना एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलोके सिंह यांना ' शंभरहून अधिक केबिन क्रू सहकाऱ्यांनी त्यांच्या रोस्टर केलेल्या फ्लाइट ड्यूटीपूर्वी, शेवटच्या क्षणी आजारी असल्याची तक्रार नोंदवली, ज्यामुळे आमच्या ऑपरेशनमध्ये गंभीरपणे व्यत्यय आला. कारण ही कृती मुख्यतः L1 भूमिका नियुक्त केलेल्या सहकाऱ्यांनी केली होती, त्यामुळे परिणाम असमान होता, ९० हून अधिक फ्लाइट्स विस्कळीत झाल्या तरीही सहकाऱ्यांनी कर्तव्य बजावले.'
 
मात्र एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने बेजबाबदार कर्मचारी वगळता इतर कर्मचाऱ्यांनी पाहुण्यांचे चांगले आदरातिथ्य केले आहे. त्यानी आपली ड्युटी जबाबदारी व्यवस्थित पार पडल्याचे व्यवस्थापनाने सांगितले आहे. या रद्दबादल झाल्याने विमान उड्डाण वाहतूक मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण मागितले असल्याने व्यवस्थापन याबाबत कर्मचाऱ्यांची चर्चा करणार आहे. डीजीसीए नियमाअंतर्गत मंत्रालयाने कायद्याची पूर्तता करत उद्भवलेला प्रश्न सोडविण्यासाठी सांगितले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
ममता बॅनर्जी अधुनिक जिना, भाजप नेते तरुण चुघ यांची ममता सरकारवर बोचरी टीका! पश्चिम बंगालमध्ये वक्फ विरोधात हिंसक परिस्थिती कायम

ममता बॅनर्जी अधुनिक जिना, भाजप नेते तरुण चुघ यांची ममता सरकारवर बोचरी टीका! पश्चिम बंगालमध्ये वक्फ विरोधात हिंसक परिस्थिती कायम

Mamata Banerjee "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आधुनिक जिना म्हणून कार्यरत आहेत. जिना जे काम करत होते आता तेच काम ममता बॅनर्जी करत आहेत. मुर्शिदाबादमध्ये घडलेल्या घटना या १९४० सालतील मुस्लिम लीग कृतीप्रमाणेच घडताना दिसतात", अशी बोचरी टीका भाजप नेते तरुण चुघ यांनी १३ एप्रिल रोजी रविवारी प्रसारमाध्यमाशी बोलताना केली आहे. वक्फ सुधारित विधेयकावरून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ममता सरकार सपशेल अयशस्वी ठरले आहे...

कल्याणमधील आरोपी विशाल गवळी याची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील आरोपी विशाल गवळी याची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने रविवारी सकाळी तळोजा कारागृहात आत्महत्या केली आहे. या प्रकरणात आरोपी विशाल याला अटक झाल्यापासूनच समाजातील सर्वच स्तरातून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात होती. परंतु आज विशालच्या आत्महत्येमुळे पिडीतेला नैसर्गिकरित्या न्याय मिळाला आहे असे म्हणत समाजाच्या विविध स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे . पिडीतेला न्याय मिळाला असला तरी कायद्याने त्याला फाशी झाली असती तर इतरांवर कायद्यांचा धाक राहिला असता असे सर्वच स्तरातून बोलले जात ..

मध्य प्रदेशात हनुमान जयंती मिरवणुकीत जमावाकडून हिंदूंवर दगडफेक, नऊ जण पोलिसांच्या ताब्यात

मध्य प्रदेशात हनुमान जयंती मिरवणुकीत जमावाकडून हिंदूंवर दगडफेक, नऊ जण पोलिसांच्या ताब्यात

Hanuman Jayanti मध्यप्रदेशातील गुना शहरातील हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणात संबंधित पोलिसांनी नऊ जणांना अटक केली होती. यावर अधिकाऱ्यांनी रविवारी १३ एप्रिल २०२५ रोजी माहिती दिली आहे. यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना कर्नलगंज येथे असलेल्या मशि‍दीच्या भोवताली घडली आहे. सायंकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी दोन्ही गट एकमेकांसमोर आले. यावेळी अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ते घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121