वीर सावरकर हा या निवडणूकीचा मुद्दा नाही : शरद पवार

    18-May-2024
Total Views | 53
 
MVA
 
मुंबई : वीर सावरकर हा या निवडणूकीचा मुद्दा नाही, असं वक्तव्य शरद पवारांनी (Sharad Pawar) केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सभेत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना एक आव्हान दिलं होतं. यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. शनिवारी मुंबईमध्ये महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
 
"राहुल गांधींनी आता निवडणूकीपुरतं वीर सावकरांबद्दल बोलणं आणि त्यांचा अपमान करणं बंद केलं आहे. काँग्रेस दिवसरात्र वीर सावरकरांचा अपमान करते. आज हे त्यांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. आता राहुल गांधी कधीही वीर सावरकरांचा अपमान करणार नाही, असं त्यांच्याकडून वधवून घ्या," असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना दिले होते.
 
 हे वाचलंत का? - महाराष्ट्रात आज योगींच्या सभांचा झंजावात!
 
यावर शरद पवार म्हणाले की, "निवडणूकीच्या मुद्दांमध्ये वीर सावरकर हा विषय नाही. राहुल गांधींनी वीर सावरकरांबद्दल कोणतंही भाष्य केलं नाही, असं म्हणणं म्हणजे काही कारण नसताना एकप्रकारे चिथावणी देण्याचं काम मोदी करत आहेत. त्यांचं भाषण हे जाणीवपूर्वक भाजपची धर्मांध प्रवृत्ती पुढे ठेवून वक्तव्य केलेलं आहे."
 
"आज सामाजिक ऐक्य हा विषय संपुर्ण देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे त्यांनी यासंदर्भात तारतम्य दाखवण्याची आवश्यकता आहे. पण, दुर्दैवाने हे पहिले प्रधानमंत्री आहेत जे याबाबत तारतम्य दाखवत नाहीत," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची 'ममता', मिथून चक्रवर्तींचा हल्लाबोल

Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी बारताच्या संविधानाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121