खलिस्तान समर्थक 'अमृतपाल'च्या आईला पोलिसांनी घेतले ताब्यात

    08-Apr-2024
Total Views | 71
 Amritpal Singh
 
चंदीगढ : पंजाब पोलिसांनी रविवार, दि. ७ एप्रिल २०२४ खलिस्तानी अमृतपाल सिंगची आई बलविंदर कौरला पंजाबमधील अमृतसर येथून अटक केली. अमृतपालचे काका सुखचैन सिंग आणि इतर ४ जणांनाही अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण अमृतपालसाठी मोर्चा काढण्यासाठी भटिंडा येथे जात होते.
 
अमृतपालचे कुटुंबीय इतरांसह रविवार, दि. ८ एप्रिल २०२४ भटिंडा येथे खालसा चेतना मार्चचे आयोजन करणार होते. अमृतपालला आसाममधील दिब्रुगड तुरुंगातून पंजाबमधील काही तुरुंगात आणावे, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार होता. हा मोर्चा भटिंडा येथील तलवंडी साबो येथील तख्त दमदमा साहिब येथून सुरू होऊन अमृतसर येथील तख्त साहिब येथे संपणार होता. या कार्यक्रमात अमृतपालच्या कुटुंबियांशिवाय अनेक धार्मिक संघटनांचाही सहभाग होता.
 
 
अटक करण्यात आलेल्या सर्वांना चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे वृत्त आहे. या मोर्चाला भटिंडा प्रशासनाने परवानगी दिली नसल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यांनी विना परवानगी मोर्चाचे आयोजन करण्याची तयारी केली होती. कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन परवानगी देण्यात आली नाही.
 
पोलिसांनी अमृतपालची आई बलविंदर कौर आणि इतर अटक केलेल्या लोकांवरही गुन्हा दाखल केला आहे. उल्लेखनीय आहे की बलविंदर कौर ने दि. २२ फेब्रुवारी २०२४ नंतर अमृतसरमधील अकाल तख्त साहिब येथे उपोषण सुरू केले होते. हे उपोषणही अमृतपालला पंजाबमध्ये आणण्याबाबत होते.
 
 
'वारीस पंजाब दे'चा प्रमुख खलिस्तानी अमृतपाल सिंग याला एप्रिल २०२३ मध्ये अटक करण्यात आली होती. याआधी फेब्रुवारीमध्ये त्याने आपल्या साथीदारांसह अमृतसरजवळील अजनाळा येथील पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. यानंतर अमृतपालवर गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई पाहून अमृतपाल पळून गेला होता. जवळपास महिनाभर तो इकडे तिकडे लपून राहिला. त्याला सुरक्षा यंत्रणांनी एप्रिल २०२३ मध्ये गुरुद्वारातून अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी आसाममधील दिब्रुगड तुरुंगात करण्यात आली. त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) देखील लावण्यात आला होता.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
कबरीच्या वादात सुप्रिया सुळेंची उडी; म्हणाल्या, बऱ्याच गोष्टी या आस्थेचे विषय...

कबरीच्या वादात सुप्रिया सुळेंची उडी; म्हणाल्या, "बऱ्याच गोष्टी या आस्थेचे विषय..."

राज्यात औरंगजेबच्या कबरीवरून तणाव चांगलाच वाढल्याचं दिसतंय. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानेही सोमवारी कबर हटवण्यावरून राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडल्याचं पाहायला मिळतंय. "जो काही निर्णय घ्यायचा आहे तो इतिहासकारांना घेऊ द्या. बऱ्याच गोष्टी या आस्थेचे विषय असतात. प्रत्येकाच्या आस्थेचा विषय असून यात कोणीही ढवळाढवळ करू नये", असे सुप्रिया सुळे यांचे म्हणणे आहे. Supriya Sule on Aurangzeb Kabar..