वर्षा गायकवाडांना मोठा धक्का! प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्यं

    29-Apr-2024
Total Views | 252

Varsha Gaikwad & Prakash Ambedkar 
 
पुणे : उज्वल निकम यांच्या उमेदवारीबाबत प्रकाश आंबेडकरांनी मोठं वक्तव्य केलं आहे. उज्वल निकम यांच्यावर कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही. त्यांच्यामुळे लोकांना एक चॉईस मिळतो, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
 
महायूतीने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी घोषित केली आहे. यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली. सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, “एकेकाळी काँग्रेसकडून मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश गोखले यांना उभं करण्यात आलं होतं आणि ते निवडूनही आले होते. त्यामुळे या गोष्टी चालत राहतात. लोकसभेमध्ये एक चांगला प्रतिनिधी जायला हवा. उज्वल निकम महाराष्ट्रातलं एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यावर कुणी आक्षेप घेऊ शकत नाही. त्यामुळे अशा माणसांना उभं केलं तर लोकांना चॉईस राहतो, असं मी मानतो,” असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "संजय राऊत नव्हे संजय पवार!"
 
एकीकडे लोकसभेच्या काही जागांवर आपण काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे, महायूतीचे उमेदवार उज्वल निकम यांच्या उमेवारीवरील त्यांची प्रतिक्रिया ही वर्षा गायकवाडांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
 
तसेच “यवतमाळ-वाशिम मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून भावना गवळी उभ्या राहणार नाहीत, असं ज्यावेळी जाहीर झालं त्यावेळी तिथे एक चांगला उमेदवार देऊन ती जागा जिकण्याची उद्धव ठाकरेंना चांगली संधी होती. पण त्याठिकाणी हे दिसलं नाही. अनेक मतदारसंघांमध्ये ते चांगले उमेदवार देऊ शकत होते. परंतू, जे लढू शकत नाहीत, असे उमेदवार त्यांनी उभे केले आहेत,” असेही ते म्हणाले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र

पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र

मुंबई, “गागर में सागर भरना’ अशी एक म्हण हिंदीत प्रसिद्ध आहे. अगदी तसेच कार्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी केले. भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशादर्शक मांडणी त्यांनी केली. पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र आहे,” असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल रवींद्र नारायण रवी यांनी मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी केले. एप्रिल १९६५ मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी प्रथमच रुईया महाविद्यालयात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. त्याच ऐतिहासिक स्थळी त्याच ..

एआयच्या मदतीने जनसंपर्कातील कामे प्रभावीपणे करा : ब्रिजेश सिंह`पीआरएसआय`च्या वतीने राष्ट्रीय जनसंपर्क दिवस उत्साहात साजरा

एआयच्या मदतीने जनसंपर्कातील कामे प्रभावीपणे करा : ब्रिजेश सिंह`पीआरएसआय`च्या वतीने राष्ट्रीय जनसंपर्क दिवस उत्साहात साजरा

``आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुध्दिमत्ता हे व्यवस्थापन व संवाद क्षेत्रात एक प्रभावी साधन ठरत आहे. जनसंपर्क क्षेत्र हे विश्वासावर चालते. कृत्रिम बुध्दिमत्ता आणि चॅटजीपीटी आदीसारख्या तंत्रज्ञानांनी मोठा बदल घडवून आणला आहे. एआय, चॅटजीपीटी, कॅनव्हा आदी सगळी साधने आहेत, याचा वापर योग्यरित्या करायला शिका. या साधनांचा उपयोग करून जनसंपर्क क्षेत्रातील कामे अधिक चांगली आणि प्रभावीपणे करावीत``, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले...

धर्मादाय रूग्णालयांच्या संनियंत्रणासाठी राज्यस्तरीय विशेष तपासणी पथक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

धर्मादाय रूग्णालयांच्या संनियंत्रणासाठी राज्यस्तरीय विशेष तपासणी पथक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

राज्यातील धर्मादाय रूग्णालयांकडून निर्धन, गरीब रूग्णांवर उपचार मोफत व्हावेत. रूग्णालयांनी शिल्लक खाटा, निर्धन रूग्ण निधींची माहिती (आयपीएफ) ऑनलाईन प्रणालीत नोंद करावी. काही रूग्णालयात अनामत रक्कम घेतल्याशिवाय उपचार केले जात नसल्याच्या तक्रारी येतात . या सर्व बाबींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा धर्मादाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयातून विशेष तपासणी पथक तयार करण्याचे निर्देश बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121