राहुल गांधी यांची डीएनए चाचणी करा; डाव्या आघाडीचा हल्लाबोल

    23-Apr-2024
Total Views | 129
p v
 
नवी दिल्ली : राहुल गांधी हे चतुर्थ श्रेणीचे नागरिक असून त्यांची डीएनए चाचणी करण्याची गरज आहे, असा टोला डाव्या आघाडीचे आमदार पी. व्ही. अन्वर यांनी लगावला आहे.
 
केरळमध्ये काँग्रेस आणि डावी आघाडी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी हे वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर भाजपसह डाव्या आघाडीनेही उमेदवार उभा केला आहे. केरळमध्ये प्रचार करताना डावे आणि काँग्रेस एकमेकांवर यथेच्छ टिका करत आहेत.
 
डाव्या आघाडीतर्फे पलक्कड येथे आयोजित एका प्रचारसभेत आमदार पी. व्ही. अन्वर यांनी राहुल गांधी यांच्यावर तोंडसुख घेतले. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी हे चतुर्थ श्रेणीचे नागरिक झाले आहेत. ‘गांधी’ हे आडनाव लावण्याची त्यांची लायकी नसून त्यांना आता केवळ 'राहुल' असेच संबोधण्यात यावे. नेहरू घराण्यातील व्यक्ती असे बोलूच शकत नाही, त्यामुळे राहुल गांधी यांची डीएनए चाचणी करण्याचीही गरज असल्याचे अन्वर म्हणाले.
 
केरळमध्ये काँग्रेसचा प्रचार करताना राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्यावर टिका केली होती. ,राहुल गांधी म्हणाले होते की, देशातील दोन मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आहे, मात्र विजयन अद्यापही बाहेर असल्याविषयी त्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. आपण २४ तास भाजपवर टिका करतो, मात्र विजयन हे २४ तास आपल्यावर टिका करत असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले होते.



अग्रलेख
जरुर वाचा

'या'देशातील मुस्लिमांना हजयात्रा करता येणार नाही, भारतासोबत १४ देशातील नागरिकांच्या व्हिसांवर बंदी

Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही...

कंपनीतील कर्मचार्‍यांना कुत्र्याप्रमाणे रांगायला, जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडलं; काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

कंपनीतील कर्मचार्‍यांना कुत्र्याप्रमाणे रांगायला, जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडलं; काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

Kerala Firm Viral Video : एका खाजगी कंपनीतील बॅासने कर्मचाऱ्यांसोबत अमानुष वागणूक केल्याचा संतापजनक प्रकार केरळमधून समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दोरीने बांधलेल्या गळ्यात पट्टा लावलेल्या कुत्र्यांप्रमाणे रांगायला लावल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असून संबंधित बॉसवर कडक कारवाईची मागणी होत आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कामगार मंत्रालयाने याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता हा कथित व्हिडिओ ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121