भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी द्रमुक आणि काँग्रेसचे एकमत!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात

    10-Apr-2024
Total Views | 25
Narendra Modi tamil nadu sabha


नवी दिल्ली :   
मोदी सरकार देशातील भ्रष्टाचाराविरोधात लढा देत आहे, तर द्रमुक आणि काँग्रेस भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी एकत्र येत आहेत; असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमध्ये केला. लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमधील वेल्लोर आणि मेट्टुपालयम येथे जाहिर सभांना संबोधित केले.

यावेळी त्यांनी सत्ताधारी द्रमुक सरकारवर जोरदार टिका केली. ते म्हणाले, द्रमुकने तामिळनाडू आणि देशाच्या भावी पिढीला उध्वस्त करण्याचा चंग बांधला आहे. द्रमुकच्या कार्यकाळात शाळकरी मुलेही अमली पदार्थांच्या आहारी गेली आहेत. त्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे द्रमुक कुटुंबाशी संबंध आहेत, असा आरोप पंतप्रधानांनी केला.


हे वाचलंत का? - जीएसटी-रेरा सारख्या निर्णयामुळे देशात आर्थिक क्रांती!


द्रमुक पक्षाचे राजकारण फूट पाडा आणि राज्य करा यावर आधारित असल्याचा टोला पंतप्रधानांनी लगावला. ते पुढे म्हणाले, देशात फूट पाडण्याचे काम द्रमुक करत आहे. द्रमुक हे भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे दुसरे नाव आहे. आज देश ५ जी तंत्रज्ञानात जागतिक विक्रम करत आहे. मात्र, एकेकाळी याच द्रमुकने टूजी घोटाळा करून देशाची बदनामी केली होती. भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी द्रमुक आणि काँग्रेसचे एकमत आहे. मोदी सरकार भ्रष्टाचार हटवा म्हणते तर द्रमुक आणि काँग्रेस भ्रष्टाचाऱ्यांना वाचवा असा नारा देत असल्याचाही टोला पंतप्रधानांनी यावेळी लगावला.

कच्छथीवू बेट श्रीलंकेस देण्याविषयी द्रमुक आणि काँग्रेसचे एकमत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. काँग्रेस सत्तेत असताना श्रीलंकेला कच्छथीवू बेट देण्यात आले. कोणाच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला यावर काँग्रेस मौन बाळगून आहे. काही दिवसांपूर्वी आमचे मच्छिमार तेथे पकडले गेले, यावरही काँग्रेसने मत व्यक्त केले नाही. मात्र, त्या मच्छिमारांना केंद्र सरकारने सोडवून आणले. त्यामुळे द्रमुक आणि काँग्रेस हे तामिळनाडूच्या हिताचे शत्रू असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.




अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात हिंसाचार कायम!धर्मांधांनी हिंदूंच्याच दुकानांना केले लक्ष्य; अहिंदूंची दुकाने शाबूत, तर काहींनी भितीपोटी मालदात केले स्थलांतर

मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात हिंसाचार कायम!धर्मांधांनी हिंदूंच्याच दुकानांना केले लक्ष्य; अहिंदूंची दुकाने शाबूत, तर काहींनी भितीपोटी मालदात केले स्थलांतर

Waqf Amendment Act पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायदा संसदेत पारित केल्यानंतर धर्मांधांनी हिंदूंवर, त्यांच्या घरांवर आणि दुकानांना टार्गेट करताना दिसले आहेत. मात्र, मुस्लिमांच्या दुकानांना काहीच झाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर इस्लामी कट्टरपंथीयांनी पेट्रोल आणि बॉम्बने हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले. अशातच आता मुर्शिदाबादमधून काही हिंदूंनी परिस्थिती पाहता पळ काढला आहे. अशातच संबंधित परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ममता बॅनर्जी सरकार अपयशी ठरल्याच्या टीका विरोधकांकडून ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121