लोकसभेनंतर राष्ट्रवादी पुन्हा पवारांकडे?, रोहित पवारांचे दिवास्वप्न...

रोहित पवारांचा दावा

    05-Mar-2024
Total Views | 72

Ajit Pawar & Sharad Pawar

मुंबई :
लोकसभा निवडणुकीनंतर अजितदादांकडील काहीजण परत शरद पवारांकडे येतील, असा दावा शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. मंगळवारी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्यं केलं आहे.
 
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, "लोकसभा निवडणुक संपल्यानंतर २० ते २३ आमदार परत एकदा शरद पवारांकडे येतील. आतासुद्धा बऱ्यापैकी काही आमदार शरद पवार साहेबांचा फोटो लावतात. यापुढे हा आकडा वाढतच जाणार आहे," असा दावा त्यांनी केला आहे.
 
ते पुढे म्हणाले की, "अजितदादांच्या पक्षातील एक नेता अशा काही आमदारांना गोळा करतोय जे म्हणतात की, आम्हाला भाजपच्या चिन्हावर लढायचं आहे. तो आकडा ११ ते १२ च्या आसपास गेला आहे. त्यामुळे ते म्हणणार की, आम्ही भाजपच्या चिन्हावर लढू आणि बाकीचे २२, २३ आमदार म्हणतील की, साहेबांकडे परत जाऊ. त्यामुळे त्या पक्षात कोण राहतात हे बघावं लागणार आहे," असेही ते म्हणाले आहेत.
 
राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ही पहिलीच लोकसभा निवडणुक आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणता गट बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121