काँग्रेसला पुन्हा सुरुंग लागण्याची शक्यता; आमदारांनी दिले बंडाचे संकेत

    27-Mar-2024
Total Views | 129
congress
 
बंगळुरु : देशभरात लोकसभा निवडणुक २०२४ चे वारे वाहु लागले आहेत. सर्वंच पक्ष लोकसभेच्या जागेसाठी उमेदवार घोषित करत आहेत. अशामध्ये काँग्रेसला पुन्हा सुरुंग INC MLA resign लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे पाच आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. यात तीन विधानसभेतील आमदार आहेत, दोन विधान परिषदेतील आमदार आहेत.
 
कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. एमसी सुधाकर यांनी आम्ही घराण्यांते गुलाम नाही असं अनेक आमदारांचं म्हणणं आहे आणि त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेस लोकसभा निवडणुकीत कुटुंबातच तिकीटवाटप करत आहे. आम्ही कुटुंबाचे गुलाम नाही असं अनेक आमदारांचं म्हणण असल्याचं डॉ. एमसी सुधाकर यांनी म्हटल्याचं माध्यमांमध्ये वृत्त आहे.
 
कोलार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री केएच मुनीयप्पा यांच्या नातेवाईकाला तिकीट दिले. त्यावरुन पक्षात नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. आम्ही मुनीयप्पा कुटुंबाचे गुलाम नाही असं अनेक आमदारांच म्हणणं आहे.
 
पाच आमदारांनी पार्टी हायकमांडकडे कुटुंबातच तिकीट देण्यावरुन नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर या आमदारांनी पक्षाचा राजीनामा देण्याची धमकीही हायकमांडला दिली आणि आपली नाराजी व्यक्त केली. यावर पार्टी हायकमांडने आमचं म्हणणं एकुन घेतलं पण त्यावर कोणतीही कारवाई केली नाही अथवा आमच्या त्याची दखल घेतली नाही असंही या आमदारांनी म्हटलं आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जोधपूरमधून गेल्या ४८ तासांत

जोधपूरमधून गेल्या ४८ तासांत 'लव्ह जिहाद'ची तिसरी घटना उघड! स्नॅपचॅटवर अल्पवयीन मुलीला हिंदू असल्याचे भासवत प्रेमाच्या जाळ्यात ओढलं

(Jodhpur Love Jihad Case) राजस्थान येथील जोधपूरमधून लव्ह जिहादची प्रकरणे समोर येत आहेत. लव्ह जिहादच्या नावाखाली निष्पाप हिंदू मुलींना लक्ष्य केले जात आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे या घटना एकामागून एक उघडकीस येत आहेत. अवघ्या दोन दिवसांत अशी तीन प्रकरणे समोर आली आहेत. रविवारी २० एप्रिल रोजी जोधपूरच्या खांडा फालसा पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याने स्नॅपचॅटवर 'अशोक मालवीय' हे नाव वापरत हिंदू असल्याचे भासवत एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली होती...

दरवर्षी २१ एप्रिल दरम्यान रंगणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव; सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा!

दरवर्षी २१ एप्रिल दरम्यान रंगणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव; सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा!

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या 'राजा हरिश्चंद्र' या चित्रपटाचे पहिले प्रदर्शन २१ एप्रिल १९१३ रोजी गिरगाव येथील ऑलिम्पिया थिएटर येथे झाले होते. त्या घटनेला ११२ वर्ष पूर्ण झाली आहेत. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेत दरवर्षी याच काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचा 'चित्रपताका' या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. तसेच, तंत्रज्ञानावरील आव्हानांवर मात करण्यासाठी मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांना राज्य सरकारकडून आर्थिक पाठबळ देण्यात येणार ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121