बारामती लोकसभेत नवा ट्विस्ट! विजय शिवतारेंनी घेतली पवारांच्या कट्टर विरोधकांची भेट

    20-Mar-2024
Total Views | 119
 
Vijay Shivtare & Anantrao Thopte
 
पुणे : शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी बारामतीत दोन्ही पवारांविरोधात निवडणूक लढवण्याचा निश्चय केला असताना आता काँग्रेस नेते अनंतराव थोपटेंची भेट घेतली आहे. त्यांनी बुधवारी भोर येथे जाऊन त्यांची भेट घेतली असून बारामती लोकसभेबाबत त्यांच्याशी चर्चा केली आहे.
 
अनंतराव थोपटे हे शरद पवारांचे कट्टर विरोधक असून त्यांच्यामुळे ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचेही सांगण्यात येते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी अनंतराव थोपटेंची भेट घेतली होती. त्यानंतर आता विजय शिवतारेंनीही थोपटेंची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.
 
हे वाचलंत का? - मनसे-भाजप युतीचं 'राज' दोन दिवसांत स्पष्ट होणार! फडणवीसांचं सूचक वक्तव्य  
 
विजय शिवतारे म्हणाले की, "बारामतीत अनेक कुटुंब आहेत. मग पवारच का? अनंतराव थोपटे त्यावेळी मुख्यमंत्री झाले असते. पण शरद पवारांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर आता २५ वर्षांनंतर येऊन ते सांगणार की, मी तुमच्या पाठीशी आहे. याला काहीही अर्थ नाही."
 
तसेच यावेळी बोलताना अनंतराव थोपटे म्हणाले की, "माझा शिवतारेंना आशीर्वाद आहे. शरद पवार हे शेवटपर्यंत माझ्या विरोधात होते. तेव्हा दिल्ली माझ्यासोबत होती. पण त्यावेळी माझा पराभव झाला. तो कसा झाला काय झाला हे सर्वांना माहित आहे. आता इथे शरद पवारांची मुलगी आणि अजित पवारांच्या पत्नी उभ्या आहेत. त्यानंतर आता शिवतारेदेखील उभे आहेत. मी कोणाला पाठींबा द्यायचा याबद्दल अजून अंतिम विचार केला नाही. शरद पवार मला फक्त भेटून गेले. तेव्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या," असेही ते म्हणाले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानकडून हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर, हवाई तळांना लक्ष्य; कर्नल सोफिया कुरेशींनी दिली माहिती

पाकिस्तानकडून हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर, हवाई तळांना लक्ष्य; कर्नल सोफिया कुरेशींनी दिली माहिती

( India-Pakistan Updates) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यामातून केलेल्या या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तान सातत्याने भारतातील शहरांवर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानकडून सातत्याने हल्ले सुरू असून काल रात्री त्यांनी उधमपूर, पठाणकोट आणि भटिंडा येथील भारतीय हवाई तळांवर हल्ले केले, अशी माहिती आज शनिवार, दि. १० मे रोजी परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली. तसेच पाकिस्तानने ..

पाकिस्तानला मोठा झटका! जिथून सोडत होता ड्रोन तोच तळ उध्वस्त

पाकिस्तानला मोठा झटका! जिथून सोडत होता ड्रोन तोच तळ उध्वस्त

पहलगाम इस्लामिक दहशतवाही हल्ल्याचा बदला म्हणून सुरु केलेल्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानमध्ये कहर माजवला आहे. बुधवार रात्री पासून चालू असलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवार आणि शनिवारी रात्री झालेल्या चकमकीत पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील तीन हवाई तळांवर (सुकूर, रफिकी, रहिम यार खान) भारताने हल्ला केल्याचे निदर्शनास येत असून रावळपिंडीच्या चकवाल जिल्ह्यातील चकलाला आणि मुरीद तर झांग जिल्ह्यातील शोरकोट येथील नूर खान एअरबेसवर हल्ला करत पाकिस्तानची झोप उडवल्याचे पाहायला मिळतेय...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121