"उद्धवजी, कोकणी माणूस तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाही!"

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा टोला

    14-Mar-2024
Total Views | 157

Uddhav Thackeray


मुंबई :
तुमच्या भूलथापांना कोकणी माणूस बळी पडणार नाही, असा टोला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. उद्धव ठाकरे गुरुवारी कोकण दौऱ्यावर असून गुहागर आणि दापोली इथे त्यांची सभा होणार आहे. यावर आता चित्रा वाघ यांनी टीका केली.
 
चित्रा वाघ म्हणाल्या की, "निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळाच्या वेळी कोकणाने अस्मानी संकटाचा कहर अनुभवला होता. तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री पदावर असताना कोकण दौऱ्याच्या नावाखाली चिपी विमानतळावरच अधिकाऱ्यांना बोलावून दौऱ्याचे तोंडदेखले सोपस्कार पूर्ण केले होते."
"वादळाने चार तास थैमान घातलं. पण तुम्ही कोकणी जनतेला आधार देण्यासाठी तितकाही वेळ थांबला नाहीत. आल्या पावली मातोश्री गाठली. याउलट, तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तीन दिवस कोकणात तळ ठोकून होते. वादळाने हैदोस घातलेल्या किनारपट्टीवरल्या गावांमध्ये तब्बल ७०० किलोमीटरचा प्रवास करून नुकसानीचा आढावा घेतला आणि केंद्र सरकारकडून सगळी मदत मिळवून दिली," असे त्या म्हणाल्या.
 
त्या पुढे म्हणाल्या की, "नेतृत्वात फरक असतो तो असा. पायाला भिंगरी बांधून कोकण पालथं घालत जनतेचे अश्रू पुसणारा देवेंद्रजींसारखा नेता एकीकडे आणि ठायीठायी वडिलांचा आधार घेऊन सहानुभूतीचा कटोरा जनतेसमोर फिरवणारा तुमच्यासारखा नेता दुसरीकडे," असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली आणि पतंजली विद्यापीठ, हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने ६२ वी अखिल भारतीय शास्त्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि. १८ ते २१ मार्च दरम्यान हरिद्वार येथे होत असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सत्रात पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य बाळकृष्ण यांनी सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून ती अध्यात्म, विज्ञान आणि संस्कृतीचा अद्भुत संगम आहे. संस्कृत ही आपली मूळ भाषा आहे, जी सत्यतेवर आधारित आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमा..

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्राममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्राममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

Saurav Murder उत्तर प्रदेशातील मेरठमधील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. ज्यात एका पत्नीने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह घरातील एका मोठ्या ड्रममध्ये ठेवण्यात आला आणि त्यावरील असणारे लोखंडी झाकण सिमेंटचा लेप देऊन बंद करण्यात आले. कोणालाही कसलाही संशय येऊ नये म्हणून, पत्नी तिच्या पतीच्या मोबाईलवरून त्याच्या जवळच्या लोकांना सतत मेसेज आणि कॉल करत. या संबंधीत घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी जाखल झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनास..