C-DAC Recruitment 2024 : कनिष्ठ सहाय्यक पदाकरिता आजच अर्ज करा

    13-Mar-2024
Total Views | 52
C-DAC Recruitment 2024
 


मुंबई :     'प्रगत संगणन विकास केंद्र' अंतर्गत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. C-DAC मध्ये काम करणाऱ्यांसाठी नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. 'प्रगत संगणन विकास केंद्र'मधील रिक्त पदांकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार विविध रिक्त पदांकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
 

प्रगत संगणन विकास केंद्राबाबत अधिक तपशील -

प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC), ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची एक वैज्ञानिक संस्था आहे. सी-डॅकच्या माध्यमातून देशात उच्च दर्जाचे संशोधन आणि विकास (R&D) साठी एक संस्था म्हणून, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीमध्ये आघाडीवर आहे. सी-डॅक प्रगत व सक्षम तंत्रज्ञानामध्ये सतत क्षमता निर्माण करत असून नवनवीन शोध घेत त्या कौशल्याचा लाभ घेत आहेत.

 

पदाचे नाव -

सहाय्यक ( ०१ जागा ) (खुला)

कनिष्ठ सहाय्यक ( ०१ जागा ) (ओबीसी)


शैक्षणिक पात्रता -

मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर

सरकारी संस्थेतून कम्प्युटर सर्टिफिकेट बंधनकारक


अर्ज शुल्क -

उमेदवारांकडून ५०० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल.

एससी, एसटी, पीडब्ल्यूडी उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट
 
 
भरतीकरिता होणाऱ्या परीक्षेसंदर्भात अभ्यासक्रम

लॉजिकल रिझनिंग - २५ गुण

जनरल नॉलेज - २५ गुण

इंग्लिश - २५ गुण
 
न्युमरिकल अॅबिलिटी - २५ गुण
 
डोमेन नॉलेज - ५० गुण


अधिसूचना सविस्तर वाचण्यासाठी www.cdac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.


अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. १८ मार्च २०२४ असेल.
 
लेखी परीक्षेसंदर्भातील अपडेट्स उमेदवारास ई-मेलच्या माध्यमातून देण्यात येतील


जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा

'प्रगत संगणन विकास केंद्र'च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा
 
भरतीसंदर्भातील नवनवीन अपडेट्स जाणून घेण्याकरिता येथे क्लिक करा

अग्रलेख
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..