रत्नागिरीतील कासव विणीच्या किनाऱ्यांमध्ये भर; 'या' किनाऱ्यांवर सापडली नव्याने घरटी

    01-Mar-2024   
Total Views | 303
रत्नागिरीतील ऑलिव्ह रिडले या सागरी कासवांच्या वीणीच्या किनाऱ्यांमध्ये तीन नव्या किनाऱ्यांचा समावेश. कासव संवर्धन मोहिमेचे यश... 

olive ridle


मुंबई (विशेष प्रतिनिधी): 
रत्नागिरीतील कासव विणींच्या किनाऱ्यांंमध्ये भर पडली आहे. (Olive Ridle) सध्या कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या कासव विणीच्या हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातील तीन किनाऱ्यांवर पहिल्यांदाच कासवाची घरटी आढळली आहेत. त्यामुळे रत्नागिरीत कासवांची विण होणाऱ्या किनाऱ्यांची संख्या १७ झाली आहे. (Olive Ridle)


महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमधील काही प्रमुख किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची घरटी आढळतात. यंदा ऑलिव्ह रिडले कासवांनी रत्नागिरीतील काही किनाऱ्यांना नव्याने जवळ करत भाट्ये, रोहिले आणि वरवडे किनाऱ्यांवर घरटी केली आहेत. यापूर्वी या किनाऱ्यांवर कासवाची घरटी आढळत नव्हती. रत्नागिरी जिल्ह्यात ऑलिव्ह रिडले (Olive Ridle) कासवांच्या विणीचे १४ किनारे होते, आता त्यामध्ये नव्याने आणखी ३ किनाऱ्यांची भर पडली आहे. भाट्ये किनाऱ्यावर आठवड्याभरापूर्वी एक घरटे आढळले होते. या घरट्याच्या संरक्षणासाठी त्यामधील १०८ अंडी गावखडीच्या किनाऱ्यावर हलविण्यात आली. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी या किनाऱ्यावर (Olive Ridle) कासवाचे दुसरे घरटे आढळले. त्यामुळे आता भाट्ये किनाऱ्यावर हॅचरी करुन त्याठिकाणीच अंडी संरक्षित करण्यात आली आहेत.
वरवडे किनाऱ्यावर ही चार घरटी आढळली असून त्यांना स्थानांतरित न करता त्यांचे त्याठिकाणी इन-सेटू करण्यात आले आहे.  चिपळूण तालुक्यातील रोहिल किनारी तीन ते चार घरटी आढळली असून या घरट्यातील अंडी तवसाळ या किनाऱ्यावर हलविण्यात आली आहेत. वन विभागाने या अंड्यांच्या संरक्षणासाठी हे स्थानांतरण केले असून कासव विणीच्या किनाऱ्यांमध्ये सातत्याने होणारी वाढ हे रत्नागिरीतील कासव संवर्धन मोहिमेचे यश असल्याचे, रत्नागिरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांनी सांगितले. 

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड. 
अग्रलेख
जरुर वाचा
Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत चोख प्रत्युत्तर देण्यास बुधवार, दि. ७ मे रोजी सुरुवात केली. त्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. अशातच आता सीमावर्तीभागात भारतीय लष्कराच्या जोरदार हालचाली होताना दिसतायत. पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे परंतु भारताची अत्याधुनिक यंत्रणा पाकिस्तानचा प्रयत्न अयशस्वी करत आहेत. अशातच भारत-पाकिस्तान युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तानला तात्काळ मागे हटण्याचे आणि भारतासोबतचा तणाव त्वरित कमी करण्याचे आदेश अमेरिक..

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

पाकिस्तानी लष्करातर्फे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना हमासप्रमाणे हल्ले करण्यात येत आहेत. खात्रीलायक संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया येथे ८ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी पाकची सर्वच क्षेपणास्त्रे अडवून निष्प्रभ केली. जम्मूवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना बघितल्यास ती दृश्ये इस्रायलवरील हमास शैलीच्या हल्ल्याची आठवण करून देतात. हमासतर्फेही इस्रायलर अतिशय किरकोळ दर्जाची क्षेपणास्त्रे डागण्यात येत असतात. विशेष ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121