मुंबई : राज्यातील तरुणांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जे नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची असणार आहे. महाराष्ट्रातील कारागृह विभागातील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसंदर्भात राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प जाहीर झाला असून या अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्याच्या कारागृह विभागात २ हजार पदभरती होणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली.