दिगंबर जैन श्रमण परंपरेचे सर्वोच्चनायक 'विद्यासागर महाराज' : विश्व हिंदु परिषद

    19-Feb-2024
Total Views | 66

Vidyasagar Maharaj VHP
(Vidyasagar Maharaj VHP)

मुंबई : दिगंबर जैन श्रमण परंपरेचे सर्वोच्चनायक आचार्य श्री विद्यासागर महाराज यांच्या निधनाचे वृत्त संपूर्ण देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे, असे म्हणत विश्व हिंदू परिषदेने विद्यासागर महाराजांना आदरांजली वाहिली. रविवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी छत्तीसगड येथे पहाटे २.३० च्या सुमारास विद्यासागरजी महाराजयांचे निधन झाले.

'दक्षिण भारतात जन्मलेल्या आचार्य भगवंतांनी उत्तर भारताला आपली कर्मभूमी बनवून संपूर्ण भारताला धन्य केले आ हे. विद्यासागर महाराजांच्या उदात्त विचाराने संपूर्ण भारतीय संस्कृतीला अभिमान वाटला. महाराजांनी लिहिलेले 'मूकमाटी' महाकाव्य या जगासाठी अलौकिक अतुलनीय वरदान ठरले आहे. इंडिया नाही भारत बोला, तसेच इंग्रजी नाही हिंदी बोला, अशा महाराजांच्या दैवी विचारांनी एका नवीन वैचारिक क्रांतीला जन्म दिला आहे. मांस निर्यात थांबवा, पशुधन वाचवा या सूत्रांतून त्यांची सजीवांप्रती असलेली ममता स्पष्टपणे दिसून आली.'

'विद्यासागर महाराजांच्या प्रगत विचाराने महिलांच्या शिक्षणासाठी एक कलागुणांचे स्थान आणि मुलांच्या शिक्षणासाठी श्रमण संस्कृती संस्था उपलब्ध करून दिली आहे, ज्याद्वारे नियमानुसार श्रमण संस्कृतीचा प्रसार केला गेला आहे. हातमाग योजनेच्या माध्यमातूनही स्वयंरोजगाराची ज्योत जागवून भारतीय संस्कृतीला बळ देण्यात आले आहे. विद्यासागर महाराजांच्या जाण्याने संपूर्ण मानव समाज अत्यंत दु:खी झाला आहे.', असे म्हणत विश्व हिंदु परिषदेने विद्यासागर महाराजांना आदरांजली वाहिली.

अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121