बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट? राष्ट्रपती 'मुर्मूं'च्या निर्णयावर सर्वांचे लक्ष

    16-Feb-2024
Total Views | 253
mamata banerjee
 
कोलकाता : संदेशखळी हिंसाचार प्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग (एनसीएससी) अध्यक्ष अरुण हलदर यांनी दि. १६ फेब्रुवारी शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपला अहवाल सादर केला. या अहवालात अरुण हलदर यांनी संदेशखळी येथे टीएमसी नेत्याकडून महिलांवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपती मुर्मू यांना केली आहे.
 
अरुण हलदर म्हणाले की, "संदेशखळी येथे टीएमसी नेत्याकडून महिलांवर झालेल्या अत्याचाप्रकरणी आयोगाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केलेल्या अहवालात पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या (एनसीएससी) शिष्टमंडळाने गुरुवारी संदेशखळीला भेट दिली होती.
 
शिष्टमंडळाने सांगितले की जेव्हा ते संदेशखळीच्या दौऱ्यावर होते, तेव्हा तिथल्या महिलांनी दावा केला होता की टीएमसी नेते शजहान शेख आणि त्यांच्या समर्थकांनी जबरदस्तीने जमिनीचा मोठा भाग ताब्यात घेतला आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. तेथील परिस्थिती चांगली नाही.
 
राष्ट्रपतींकडे अहवाल सादर केल्यानंतर हलदर म्हणाले की, "पश्चिम बंगालमधील परिस्थिती लक्षात घेऊन तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी शिफारस आम्ही केली आहे. पश्चिम बंगाल सरकार आणि गुन्हेगारांनी हातमिळवणी केली आहे. संदेशखळी येथील हिंसाचाराचा परिणाम अनुसूचित जाती समाजातील लोकांवरही होत आहे."
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
१४ फूट x १४ फूट आकाराची कोठडी, २४ तास सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे; तहव्वूर राणाला NIA ने कुठे ठेवलंय?

१४ फूट x १४ फूट आकाराची कोठडी, २४ तास सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे; तहव्वूर राणाला NIA ने कुठे ठेवलंय?

(Tahawwur Rana kept Highly Secure NIA Cell) २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याला गुरुवारी अमेरिकेतून प्रत्यार्पणानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. भारतात आणल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील एनआयए मुख्यालयात, एक लहान, कडक सुरक्षा असलेला कक्ष आहे, जो आता गेल्या काही वर्षांतील भारतातील सर्वात हाय-प्रोफाइल दहशतवाद तपासाचे केंद्र बनला आहे. फक्त १४ फूट बाय १४ फूट आकाराच्या या कक्षात - सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली ..

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121