...तर रविवारीही कामकाज करावे लागेल

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा विरोधकांना इशारा

    04-Dec-2024
Total Views | 29
Om Birla

नवी दिल्ली : वारंवार स्थगन प्रस्तावांद्वारे लोकसभेचे कामकाज चालू दिले नाही तर रविवारीदेखील कामकाज चालवण्यात येईल, असा इशारा लोकसभा ( Loksabha ) अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांना दिला.

हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशीही संसदेत गदारोळ झाल्याने लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. गेल्या आठवडाभरापासून सभागृहाचे कामकाज सुरळीत होऊ शकलेले नाही. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही कामकाज वारंवार तहकूब होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी सदस्यांना ताकीद दिली की, स्थगितीमुळे सभागृहाच्या कामकाजात आणखी व्यत्यय आल्यास त्यांना वेळेच्या नुकसानीची भरपाई करावी लागेल. प्रश्नोत्तराच्या तासानंतर लगेचच ओम बिर्ला म्हणाले की, शनिवारी, १४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होईल. जर स्थगन प्रस्ताव सुरूच ठेवले आणि सभागृह तहकूब होत राहिल्यास, सभागृह जेवढे दिवस तहकूब केले जाईल; तेवढे शनिवार आणि रविवारी कामकाजाला उपस्थित राहावे लागेल, असे बिर्ला यांनी स्पष्ट केले.

अग्रलेख
जरुर वाचा
वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची 'ममता', मिथून चक्रवर्तींचा हल्लाबोल

Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी बारताच्या संविधानाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121