उत्पादन क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील वाटा ५०टक्क्यांनी वाढणार

सरकारच्या विशेष प्रयत्नांना यश येणार

    31-Dec-2024
Total Views | 56
 
 
manufacture
 
 
 
नवी दिल्ली : देशातील उत्पादन क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील वाटा पुढील १० वर्षात तब्बल ५० टक्क्यांनी वाढणार आहे. २०३२ पर्यंत या क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील वाटा १४ टक्क्यांवरून २१ टक्क्यांवर जाणार आहे. अर्थव्यवस्थापन क्षेत्रातील प्रमुख कंपनी शेअरखान या कंपनीकडून देशातील उत्पादन क्षेत्राचा अहवाल प्रकाशित झाला आहे.
 
 
या अहवालानुसार उत्पादन क्षेत्रात सातत्याने केल्या जाणाऱ्या खासगी आणि सरकारी क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे भारतात हे क्षेत्र विस्तारत आहे. या क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकारकडून पीआयएल योजना राबवली जाते. या योजनेतून बंदरे. विमानतळ, रस्ते बांधणी यांसारखे पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प राबवले जातात. यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक होऊन रोजगार निर्मिती होते.
 
 
ऑगस्ट २०२४ पर्यंत या क्षेत्रात १ लाख ४६ हजार कोटींची गुंतवणुक झाली असून त्यामार्फत एकूण ९ लाख ५० हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती झाली आहे. २०३४ पर्यंत १० ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे धेय्य आहे. हे लक्ष्य साध्य करण्यात उत्पादन क्षेत्राचा मोलाचा वाटा असणार आहे. त्यादृष्टीने उत्पादन क्षेत्राची आगेकूच सुरू आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
शिक्षण क्षेत्रात युट्युब करणार महाराष्ट्राला सहकार्य

शिक्षण क्षेत्रात युट्युब करणार महाराष्ट्राला सहकार्य

भारतात 'क्रिएटिव्हिटी'ला तोड नाही. देशात मोठ्या प्रमाणावर 'क्रिएटिव्हिटी' असून त्यामध्ये मुंबईचे स्थान अग्रगण्य आहे. मुंबई हे देशाचे ‘क्रिएटिव्ह कॅपिटल’ आहे. पुढील काळात मुंबईत आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) स्थापन करण्यात येणार आहे. या इन्स्टिट्यूटच्या रचनेमध्ये युट्यूबचा सहभाग आवश्यक आहे. राज्यात शिक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहकार्याने बदल घडविण्यासाठी युट्यूबने सहकार्य केल्यास निश्चितच सकारात्मक परिणाम दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला...

महाबळेश्वर येथे २ मे ते ४ मे

महाबळेश्वर येथे २ मे ते ४ मे 'महाराष्ट्र महापर्यटन उत्सव'चे आयोजन :पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

महाबळेश्वर येथे दि.२ ते ४ मे २०२५ रोजी 'महाराष्ट्र महापर्यटन उत्सव'चे आयोजन केले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने महाबळेश्वर इथे ६० पंचतारांकित टेंट्स असतील, त्यात राहण्याची वेगळी अनुभूती लोकांना मिळणार आहे. लेझर शो,विविध पर्यटन सहली,सांस्कृतिक कार्यक्रमांचे २ ते ४ मे रोजी आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली महापर्यटन उत्सव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121