राहुल गांधींनी जातीजातींमध्ये भांडण लावण्याची सुपारी घेतली! मंत्री नितेश राणेंची टीका

    24-Dec-2024
Total Views | 77
 
Nitesh Rane
 
मुंबई : राहुल गांधींनी जातीजातींमध्ये भांडण लावण्याची सुपारी घेतली आहे, अशी टीका मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. मंगळवार, २४ डिसेंबर रोजी त्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास खात्याचा पदभार स्विकारला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
मंत्री नितेश राणे म्हणाले की, "राहुल गांधींनी देशात जातीजातींमध्ये भांडण लावण्याची सुपारी घेतली आहे. हिंदूंना विभागणे आणि त्यांच्यांत भांडण लावणे हे त्यांचे मुख्य काँट्रॅक्ट आहे. त्यांना हिंदू राष्ट्रात फूट पाडायची आहे. महाराष्ट्रात हिंदुंनी एकत्र येऊन मतदान कसे केले, याची त्यांना मिरची लागली आहे. मुसलमान समाजातही तेवढ्याच जाती आहेत. पण राहुल गांधी कधीही त्या जातींचा उल्लेख करताना दिसले नाहीत. मात्र, हिंदूंना वेगवेगळ्या जातींमध्ये विभागून त्यांना तोडण्याचा एककलमी कार्यक्रम राहुल गांधी करत आहेत," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  'त्या'वेळी काँग्रेस सरकारने सुईच्या टोकाएवढी जमीनसुद्धा दिली नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
संजय राऊतांना टोला!
 
संजय राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, "ज्या संजय राऊतांचा पक्ष स्वत:चा पायावर उभा राहू शकत नाही त्यांनी कुबड्यांची भाषा करू नये. उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊनच मुख्यमंत्री झाले आहेत. ते स्वत:च्या ताकदीवर मुख्यमंत्री झालेले नव्हते. त्यामुळे दुसऱ्यांच्या कुबड्यांची भाषा करण्यापेक्षा स्वत:च्या मालकाची अवस्था पाहा."
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121