ठाणे जिल्ह्यात भाजपला बळ

एकूण मतदानापैकी २६ टक्के मते भाजपला

    02-Dec-2024
Total Views | 67
BJP

ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात याआधीही मोठा भाऊ असलेल्या भाजपने १८ पैकी नऊ जागा जिंकून ठाणे ( Thane ) जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजपच मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले आहे. २०१९ सालच्या तुलनेत भाजपने एक अतिरिक्त जागा जिंकली असून, एकूण झालेल्या मतदानाच्या ५६ टक्क्यांपैकी २६ टक्के मते भाजपच्या पारड्यात पडली आहेत. तर, जिल्ह्यात २० टक्के मते मिळवून शिवसेना दुसर्‍या स्थानी आहे.

१८ पैकी नऊ जागा लढवून भाजपने १० लाख, ३४ हजार, १०५ मते मिळविली असल्याने जिल्ह्यात भाजपच्या कमळाचा जनाधार वाढताना दिसत आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या ठाणे जिल्ह्यात ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवाडा, मिरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, कल्याण ग्रामीण, कळवा-मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण पश्चिम, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण, शहापूर आणि मुरबाड या १८ विधानसभेच्या जागा आहेत.

जिल्ह्यात ३८ लाख, ४५ हजार, ४२ पुरुष आणि ३३ लाख, ८२ हजार, ८८२ महिला असे एकूण ७२ लाख, २९ हजार, ३३९ मतदार असले तरी एकूण १९ लाख, ३१ हजार, ९७३ महिला आणि पुरुष २१ लाख, ८३ हजार, ५११ असे एकूण ४१ लाख, १५ हजार, ७५७ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. २०१९ सालच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला सहा तर भाजपने आठ जागांवर विजय मिळविला होता. तर, २०२४ च्या निवडणुकीत भाजपने नऊ जागा लढवून सर्व जागा जिंकल्या आहेत. यात भिवंडी (पश्चिम) मधून भाजपच्या महेश चौगुले यांनी ७० हजार, १७२ मते, मुरबाडमधून किसन कथोरे यांना १ लाख, ७५ हजार, ५०९, उल्हासनगरात कुमार आयलानींना ८२ हजार, २३१, कल्याण पूर्वेच्या गडात सुलभा गायकवाड यांना ८१ हजार, ५१६, डोंबिवलीत मंत्री रविंद्र चव्हाण १ लाख, २३ हजार, ८१५, मिरा-भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता यांना १ लाख, ४४ हजार, ३७६, ठाणे मतदारसंघात हॅट्ट्रिक करणारे संजय केळकर यांना १ लाख, २० हजार, ३७३, ऐरोलीमधून निर्विवाद यश मिळवणार्‍या गणेश नाईक यांनी १ लाख, ४४ हजार, २६१ आणि बेलापूर मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी ९१ हजार, ८५२ मतांची बेगमी करीत राष्ट्रवादीच्या संदीप नाईक यांच्यावर ३७७ मतांनी निसटता विजय मिळवला. यानुसार, जिल्ह्यात भाजपला १० लाख, ३४ हजार, १०५ एकूण मते मिळाली आहेत. शिवसेनेने सात जागा लढवून ८ लाख, ३९ हजार, ५९५ मते मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121