उत्तराखंडमध्ये जानेवारीपासून ‘समान नागरी कायदा’

    19-Dec-2024
Total Views | 62

uttarakhand
 
नवी दिल्ली : (Uttarakhand) “उत्तराखंडमध्ये जानेवारी २०२५ पासून ‘समान नागरी कायदा’ लागू करण्यात येणार आहे,” अशी माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी बुधवार, दि. १८ डिसेंबर रोजी दिली.
 
डेहराडूनमध्ये उत्तराखंड गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा विकास मंडळाच्या बैठकीत धामी म्हणाले की “राज्य सरकारने आपला ‘गृहपाठ’ पूर्ण केला आहे आणि जानेवारी २०२५ पासून ‘समान नागरी कायदा’ राज्यभर लागू केला जाणार आहे.
 
उत्तराखंडचा ‘समान नागरी कायदा’ ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मूळ भावनेतून समाजाला नवी दिशा देईल. या कायद्यामुळे विशेषतः देवभूमीतील महिला आणि बालकांसाठी सक्षमीकरणाची नवी दारे उघडली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘समान नागरी कायदा’ लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरेल,” असे धामी म्हणाले.
 
“समान नागरी कायद्या’साठी उत्तराखंड हे आदर्श उदाहरण ठरणार आहे. याद्वारे समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार मिळणार असून समाजात सामाजिक न्याय आणि समानतेची भावना मजबूत होईल,” असा विश्वासदेखील धामी यांनी व्यक्त केला.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121