घुसखोर बांगलादेशींवर कारवाई, ठाण्यात एक तर भिवंडीत दोघांना अटक

    18-Dec-2024
Total Views | 20
 
THANE
 
ठाणे : (Bangladeshi) बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश केलेल्या बांग्लादेशीवर कारवाई सुरू केली आहे. ठाण्यातील मनोरमा नगर येथे आयुर्वेदीक औषधांचा बाजार मांडून नागरिकांना गंडवणाऱ्या एकाला तर भिवंडीत दोन बांग्लादेशीना पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
 
ठाण्यात मनोरमा नगर येथे शिरअली मोहम्मद शेख हा बांग्लादेशी स्वतः रोगी असून हा सगळ्यांना आयुर्वेदिक औषधे विकून गंडवत होता. भाजपचे दत्ता घाडगे यांनी त्याला पकडून कापूरबावडी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.भिवंडी येथील खोका कंपाऊंड परिसरातील झोपडपट्टीमध्ये भाड्याच्या खोलीत वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशींना भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. रमजान शेख (३२) आणि कबीर शेख (४०) अशी या बांगलादेशींची नावे आहेत. दोघेही बांगलादेशातील नानपुर भागातील आहेत. दोघेही भिवंडी शहरात नळ जोडणीचा व्यवसाय करत होते. त्यांच्याविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात पारपत्र अधिनियम १९२० चे कलम ३,४ सह विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १३,१४ अ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांनी भारतात प्रवेश कसा मिळविला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
बंगालमधील हिंदूंसाठी ममता बॅनर्जी स्वतःच सर्वात मोठा धोका

बंगालमधील हिंदूंसाठी ममता बॅनर्जी स्वतःच सर्वात मोठा धोका

वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले असूनही पश्चिम बंगालमध्ये त्या विरोधात हिंसाचार सातत्याने वाढत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या घोषणेनंतर राज्यात इस्लामिक कट्टरपंथींचा उन्मात शिगेला पोहोचला. हिंदूंना लक्ष्य करून कट्टरपंथीयांकडून होत असलेल्या हल्ल्यांबाबत ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात जोरदार टीका केली आहे. त्या राज्यात जातीय तेढ पसरवत असून बंगालमधील हिंदूंसाठी ममता बॅनर्जी स्वतःच सर्वात मोठा धोका बनल्याचा आरोप त्यांनी केला आहे. Mithun Chakraborty..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121