अल्लू अर्जुन राजकारणात प्रवेश करणार का?, टीमनेच दिलं स्पष्टीकरण

    13-Dec-2024
Total Views | 26
 
allu arjun
 
 
 
मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन सध्या 'पुष्पा २ : द रुल' या चित्रपटामपळे चांगलाच चर्चेत आहेत. ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. जगभरात या चित्रपटाने ७ दिवसांत १००० कोटींचा टप्पा पार केला आहे. एकीकडे अल्लूच्या 'पुष्पा २' ची चर्चा सुरु असून दुसरीकडे तो लवकरच राजकारणात प्रवेश करणार अशाही चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, यावर आता अभिनेत्याच्या टीमने स्पष्टीकरण दिले आहे.
 
टीम अल्लू अर्जुन या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “आम्ही सर्व पत्रकार आणि वृत्तसंस्थांना विनंती करत आहोत की, कृपया असत्य असलेली माहिती पसरवू नका. अचूक आणि योग्य माहिती आम्ही या अधिकृत अकाउंटवर दिली आहे, माहिती देण्यासाठी याचाच आधार घ्या.”
 
 
 
पुढे लिहिलं आहे की, “आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, अल्लू अर्जुन राजकारणात प्रवेश करणार ही अफवा अत्यंत खोटी आणि निराधार आहे, त्यामुळे खोटी माहिती कोणीही पसरवू नये. तसेच खऱ्या आणि अचूक अपडेटसाठी अल्लू अर्जुनच्या अधिकृत टीमच्या विधानाचा आधार घ्यावा.”
 
अल्लू अर्जुन गुरुवारी दिल्लीमध्ये आला होता. यावेळी त्याने चित्रपटाच्या यशाबद्दल पत्रकारांशी संवाद साधला. ‘पुष्पा २’ चित्रपटाने अवघ्या ७ दिवसांत बॉक्स ऑफिसवर १००० कोटींची कमाई केली आहे. यावर बोलताना तो म्हणाला की, “समोर येणारे आकडे हे तात्पुरते आहेत. मात्र, चाहत्यांचं प्रेम कायमचं मनावर कोरलं गेलं आहे. मला नेहमी असं वाटतं की, मोठ मोठे विक्रम हे मोडण्यासाठीच तयार होतात. सध्या मी शीर्षस्थानी आहे. मात्र, पुढील दोन ते तीन महिन्यांत हा रेकॉर्डसुद्धा मोडला जाईल. मग तो दाक्षिणात्य किंवा हिंदी अशा कोणत्याही चित्रपटाने मोडावा, ही आपली प्रगती आहे; याचा अर्थ असा होतो की, भारत पुढे जात आहे.”
अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

(Tahawwur Rana's NIA Interrogation Begins) २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. गुरुवारी १० एप्रिलला रात्री राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाची १८ दिवसांची कोठडी दिली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता एनआयए मुख्यालयात चौकशीला सुरुवात झाली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121