परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह : रामदास आठवले

    11-Dec-2024
Total Views | 61
Ramdas Athavle

मुंबई : परभणीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या ( Constitution ) प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह असुन संविधानचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही. संविधानाचा अवमान करण्याऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

परभणीतील संविधान अवमान घटनेप्रकरणी परभणीच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांशी आपण दुरध्वनी द्वारे संपर्क साधुन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली आहे.आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करुन या मागचा सुत्रधार शोधण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे आपण करणार असल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.

परभणी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रतिकृती काढुन झालेल्या अवमानाच्या निषेधार्थ आंबेडकरी जनतेने तीव्र आंदोलन केले. रास्ता रोको केला, रेल रोको केला.संविधानाचा अवमान करणे हा अत्यंत गंभीर आणि राष्ट्रद्रोही गुन्हा आहे.या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावे यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत.या प्रकरणातील आरोपीला अटक झाली आहे.आंबेडकरी जनतेच्या भावना तीव आहेत.निषेध आंदोलनातुन त्या भावना व्यक्त झालेल्या आहेत.त्यामुळे आता आंबेडकरी जनतेने या प्रकरणी संयम बाळगुन शांतता राखण्याचे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121