“ ‘तिरंगा’ चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी मी गावी लपून बसलो होतो”, नानांनी सांगितलं कारण

Total Views | 118
 
tirangaa
 
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : अनिल शर्मा दिग्दर्शित वनवास या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यानिमित्ताने दै. मुंबई तरुण भारतने नाना पाटेकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी साकारलेल्या अनेक जुन्या कलाकृतींच्या आठवणी नानांनी सांगितल्या.
 
मेहुल कुमार दिग्दर्शित तिरंगा हा चित्रपट १९९३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात नाना पाटेकर यांनी पोलिसाची भूमिका केली होती. या चित्रपटाची एक विशेष आठवण सांगत नाना म्हणाले की, “ ‘तिरंगा’ चित्रपटाची संहिता ज्यावेळी माझ्याकडे आली तेव्हा ती आवडली नव्हती, मला केवळ त्यावेळी पैशांची गरज होती. आणि निर्मात्यांनी ते देण्याचं कबूल केल्यामुळे मी तिरंगा चित्रपट स्वीकारला. ज्यावेळी तिरंगा चित्रपट प्रदर्शित होणार होता त्यावेळी मी गावी जाऊन लपलो होतो. कारण, मला असं वाटलं की माझे मित्र-मैत्रिणी मला काय चित्रपट केला आहेस तु? असं म्हणून मला मारतील. पण आश्चर्याची बाब म्हणजे तिरंगा चित्रपट तुफान गाजला. २५ आठवडे तो चित्रपटगृहात होता. आणि २५व्या आठवड्यातच प्लाझाला बॉम्ब स्फोट झाला होता. पण खरं सांगू का चित्रपटाला नाटक किंवा नायिका नसते तर चित्रपटाचा खरा हिरो ही कथा असते यावर माझा पुर्ण विश्वास आहे. आणि जर का चुकीचे दिग्दर्शक किंवा कथा असेल तर तुमचं मातेरं होऊ शकतं यात काहीच वाद नाही”.
 
पुढे नानांनी चित्रपटसृष्टीत प्रवास कसा सुरु झाला त्याबद्दल बोलताना म्हटले की, “मी अतिशय व्रात्य माणूस होतो. गुंड झालो असतो पण मला काही माणसं जीवनात भेटली त्यांच्यामुळे मी तो गौरमार्ग न स्वीकारता नाटकांकडे वळलो आणि त्यानंतर बरीच वर्ष नाटकावरच माझं पोट होतं. खरं तर स्मिता पाटील यांच्यामुळे मी चित्रपटांमध्ये आलो. त्यांनी मला सांगितलं की नाटक करत राहा पण चित्रपटांमुळे तु जास्तीत जास्त प्रेक्षकांसमोर पोहोचू शकतोस, तुझं अभिनय कौशल्य पोहोचू शकतं. त्यामुळे चित्रपटसृष्टीत मी स्मिता पाटील यांच्यामुळेच आलो हे ठामपण सांगतो”.
 
 

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई मेट्रो-३

मुंबई मेट्रो-३ 'बीकेसी ते आचार्य अत्रे' मार्गाचे लोकार्पण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे' मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी अशा टप्पा २ अच्या संचलनाची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे. या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)कडून टप्पा २ अ ला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार, आज दि.९ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो ३च्या या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री बीकेसी ते सिद्धिविनायक मंदिर स्थानकापर्यंत मेट्रोने ..

मसूद अजहरचा भाऊ जैशचा दहशतवादी अब्दुल रौफ अझहर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार!

मसूद अजहरचा भाऊ जैशचा दहशतवादी अब्दुल रौफ अझहर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार!

पहलगाम हल्ल्या नंतर भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांना जबरदस्त उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्ण केले. दि. ७ मे रोजी रात्री १ वाजून ४ मिनिटांनी ते दीड वाजताच्या दरम्यान ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाले. भारतीय दलांनी पाकिस्तानमध्ये बहावलपूर आणि मुरीदके येथे हल्ले केले आणि जैश आणि लष्करचे मुख्यालय उद्ध्वस्त केले. कित्येक वर्षांपासून या दोन्ही दहशतवादी संघटना सातत्याने भारताविरोधात कारवाया करत आहेत. हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद प्रमूख मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रौफ अझहर जो जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल प्रमुख आणि आयसी-८१४ अपहरणाचा मास्टरमाइ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121