प्रार्थना सभेचे कारण सांगत वंचित घटकांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतरण करण्याचा कट

आमचा येशूच खरा देव असे म्हणत हिंदू देव-देवतांचा अवमान

    10-Dec-2024
Total Views | 68
 
Conversion
 
मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ख्रिश्चन सभेचे आयोजन करून वंचित घटकांना ख्रिश्चन धर्मात परिवर्तन करण्याचा कट उघड झाला. यावेळी हिंदू देवी-देवतांचा अपमान केला जात असल्याचे समोर आले आहे. केवळ येशु ख्रिस्त हाच खरा देव आहे असे बोलले जात होते. याची माहिती मिळताच रविवारी ८ डिसेंबर २०२४ रोजी हिंदू संघटना घटनास्थळी पोहोचल्या. तक्रारीनंतर पोलिसांनी ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
 
माध्यमांच्या अहवालानुसार, ही घटना मेरठ येथील परतापूर पोलीस ठाणे परिसरात घडली. शंकरपुरी परिसरात विनीत नावाच्या एका व्यक्तीचे घर आहे. विनीतने १० वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. मात्र आता तो त्याच्या सभोवताली राहणाऱ्या लोकांनाही धर्मांतरण करण्यास प्रवृत्त करत असल्याचे सांगितले जात आहे, कोणत्याही नोंदणीशिवाय तो गेल्या ५ वर्षापासून आपल्या घराचा चर्च म्हणून वापर करत आहे.
 
हिंदू संघटनेचे सदस्य आणि किसान मोर्चाशी संबंधित कार्यकर्त्यांना रविवारी विनीतच्या घरी जाऊन माहिती दिली होती. आजूबाजूच्या परिसरातील सुमारे ५०० लोकांना तेथे बायबलचे ज्ञान दिले जात असल्याचे उघड झाले. यामध्ये महिलांचा यात समावेशही होता असे सांगण्यात येते. या मेळाव्याला बाहेरूनही काही लोक आले होते. विनीतच्या घरातील एका हॉलमध्ये ख्रिश्चन प्रार्थना सभा सुरू असल्याचे हिंदू संघटनांच्या लक्षात आले. यानंतर हिंदूंनी यावरोधात आंदोलन सुरू केले.
 
 
 
 
शेतकरी संघटनेशी संबंधित गौरव पराशर यांनी प्रसारमाध्यांना सांगितले की, विनीतच्या घरात निरापराध हिंदूंना त्यांचे आजार बरे करण्यापासून त्यांना नोकरी मिळवून देण्यापर्यंत प्रलोभने दिली गेल्याची माहिती सांगण्यात आली. सभेच्या नावाखाली हिंदू धर्माचा अपमान केला जात असून येशूला खरे देव म्हटले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या ठिकाणी बहुतांश महिला आणि अल्पवयीन मुलांना धर्मांतरणासाठी प्रवृत्त केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
याप्रकरणाची माहिती हिंदू संघटनांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. यावेळी घटनास्थळाचा व्हिडिओ रेकॉर्ड करत पोलिसांनी लोकांचे जबाब घेतले आहेत. सर्व पक्षांना समज देऊन शांत राहण्याचे आवाहन केले. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून काही ख्रिश्चन साहित्य आणि एक रजिस्टरही जप्त केले गेले नसल्याची माहिती सागंण्यात आली आहे. 
 
दरम्यान याप्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून आतापर्यंत ५ आरोपींना अटक करण्यात केली. पोलीस या प्रकणाचा तपास करतील आणि विनीत कुमारने आतापर्यंत किती लोकांचे धर्मांतर केले आहे. हे शोधून काढणार असल्याचे एसपी सांगतात. यासोबत तो कोणत्या संघटनेथशी संबंधित आहे. लोकांचे धर्मांतरण करण्यासाठी त्याला पैसे कोठून मिळतात हेही कळेल.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
फक्त एक तास द्या वक्फ सुधारित कायद्यात..., ओवैसींच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने तोडले अकलेचे तारे

"फक्त एक तास द्या वक्फ सुधारित कायद्यात...", ओवैसींच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने तोडले अकलेचे तारे

Imran Masood एमआयएमचे नेते असिदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी एका सभेतून केवळ १५ मिनिटे द्या आम्ही काय करतो पाहा, असे देश विघातक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता संसदेत नुकतेच वक्फ सुधारित कायद्याला मंजूरी देण्यात आली. त्याविरोधात मु्स्लिम समाज आंदोलन करत आहे. याचपार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने वक्फ सुधारणा कायद्याबाबत मोठे विधान केले आहे. आम्ही सत्तेत आलो तर एका तासात वक्फ कायद्यात बदल करणार असल्याची धमकी वजा इशारा दिले आहे. ते हैदराबादमध्ये १३ एप्रिल रोजी मुस्लिम मिल्ली काउन्सिल..

ममता बॅनर्जी अधुनिक जिना, भाजप नेते तरुण चुघ यांची ममता सरकारवर बोचरी टीका! पश्चिम बंगालमध्ये वक्फ विरोधात हिंसक परिस्थिती कायम

ममता बॅनर्जी अधुनिक जिना, भाजप नेते तरुण चुघ यांची ममता सरकारवर बोचरी टीका! पश्चिम बंगालमध्ये वक्फ विरोधात हिंसक परिस्थिती कायम

Mamata Banerjee "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आधुनिक जिना म्हणून कार्यरत आहेत. जिना जे काम करत होते आता तेच काम ममता बॅनर्जी करत आहेत. मुर्शिदाबादमध्ये घडलेल्या घटना या १९४० सालतील मुस्लिम लीग कृतीप्रमाणेच घडताना दिसतात", अशी बोचरी टीका भाजप नेते तरुण चुघ यांनी १३ एप्रिल रोजी रविवारी प्रसारमाध्यमाशी बोलताना केली आहे. वक्फ सुधारित विधेयकावरून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ममता सरकार सपशेल अयशस्वी ठरले आहे...

कल्याणमधील आरोपी विशाल गवळी याची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील आरोपी विशाल गवळी याची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने रविवारी सकाळी तळोजा कारागृहात आत्महत्या केली आहे. या प्रकरणात आरोपी विशाल याला अटक झाल्यापासूनच समाजातील सर्वच स्तरातून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात होती. परंतु आज विशालच्या आत्महत्येमुळे पिडीतेला नैसर्गिकरित्या न्याय मिळाला आहे असे म्हणत समाजाच्या विविध स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे . पिडीतेला न्याय मिळाला असला तरी कायद्याने त्याला फाशी झाली असती तर इतरांवर कायद्यांचा धाक राहिला असता असे सर्वच स्तरातून बोलले जात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121