आता कुठे गेले काँग्रेसचे सेक्युलॅरीझम? केरळच्या मुख्यमंत्र्यांचा घणाघात

प्रियांका गांधींसाठी जमात-ए-इस्लामी मैदानात

    08-Nov-2024
Total Views | 279

pinarayi vijayan
 
 
तिरुवनंतपुरम : प्रियांका गांधी वाड्रा यांना राजकारणात आणण्यासाठी खटपट करत असताना, केरळ मध्ये मात्र आता एक नवीनच पेच उभा राहिला आहे. केरळचे मुख्यमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते पिनाराई विजयन यांनी ७ नोव्हेंबर रोजी वायनाड येथे पार पडणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीत जमात-ए-इस्लामीच्या सहभागाचा मुद्दा उपस्थित केला आहे. आता काँग्रेसचे सेक्युलॅरीझम कुठे गेलं ? असे म्हणत पिनारयी विजयन यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.

फेसबूक पोस्ट करत पिनाराई विजयन यांनी म्हटले की " प्रियांका गांधी जमात-ए-इस्लामच्या पाठिंब्यावर उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे काँग्रेसची भूमिका नेमकी काय आहे?आपला देशाला जमात-ए-इस्लामीची मूल्यं ठाऊक आहेत का ? त्या संघटनेची विचारधारा लोकशाही मूल्यांशी जुळते का ? वायनाडमध्ये जमात-ए-इस्लामीशी त्यांची युती पाहता काँग्रेस पक्षाच्या सेक्युलॅरीझमवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. “जे धर्मनिरपेक्षतेचे समर्थन करतात त्यांनी सर्व प्रकारच्या सांप्रदायिकतेला विरोध करू नये का? मुस्लीम लीगसह काँग्रेस आणि मित्रपक्ष जमात-ए-इस्लामीसोबतची युती कायम ठेवण्यासाठी काही ‘त्याग’ करत असल्याचे दिसते. काँग्रेस जमात-ए-इस्लामीची मते नाकारू शकते का? असा तिखट सवाल पिनाराई विजयन यांनी केला आहे. त्याच सोबत ते म्हणाले की जमात-ए-इस्लामी या संघटनेला भारताबद्दल किंवा तिच्या लोकशाही बद्दल तसुभर सुद्धा आदर नाही. जम्मू - काश्मीर मध्ये त्यांच्या अजेंड्या बद्दल सगळ्यांना माहिती आहे. पुढे असं सुद्धा म्हणाले की जमात-ए-इस्लामने जम्मू-काश्मीरमध्ये दीर्घकाळ विरोध करून निवडणुकांद्वारे मजबूत सांप्रदायिक विचार वाढवले ​​आहेत."

पिनाराई विजयन यांच्या मते वायनाड येथील जमात-ए-इस्लामचा तर्क असा आहे की ते काश्मिरी जमात-ए-इस्लामीसारखे नाहीत. तथापि त्यांची विचारधारा मात्र, सारखीच आहे जी कोणत्याही प्रकारचे लोकशाही मानत नाही.त्यांनी काँग्रेस नेत्यांना दिवंगत मार्क्सवादी नेते ईएमएस नंबूदीरीपाद यांनी केलेल्या जातीय युतींना विरोध केल्याचे लक्ष्यात आणून दिले.
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121