"फक्त १५ मिनिटे पोलिसांना हटवा कोण किती शक्तीशाली आहे पाहू"

    07-Nov-2024
Total Views | 215
 
Akbaruddin Owaisi
 
छत्रपती संभाजीनगर : एमआयएम आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी १५ मिनिटांचा संदर्भ देत उल्लेख केला. प्रचाराच्या वेळेचा संदर्भ देत ओवैसी म्हणाले की, १० वाजून ४५ मिनिटांची वेळ आहे, यामध्ये अजून १५ मिनिटे शिल्लक आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करत असताना ते म्हणाले की, अरे जरा धीर धरा, १५ मिनिटे बाकी आहेत. ना ती आम्हाला सोडते ना ती मला सोडते, असे वक्तव्य अकबरुद्दीन ओवैसी यांनी केले. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापणार असल्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकच्या पार्श्वभूमीवर ते छत्रपती संभाजीनगर येथील जाहीर सभेतून बोलत होते.
 
याआधी अकबरुद्दीन ओवैसी यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा १५ मिनिटांचा उल्लेख केला. प्रचारावेळी बोलत असता  ओवैसी म्हणाले की, १० वाजून ४५ मिनिटांची वेळ आहे, आणखी १५ मिनिटे बाकी आहेत. यावेळी उपस्थित लोकांना संबोधित करत असताना ते म्हणाले.
 
याआधी त्यांनी २०१२ मध्ये १५ मिनिटांबाबतचे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांनी म्हटले की, जर तुम्ही १५ मिनिटांसाठी देशातून पोलिसांना हटवले असता शक्तीशाली कोण आहे हे लवकरच समजेल. यावेळी ते म्हणाले की, आम्ही २५ कोटी आहोत, तुम्ही १०० कोटी आमच्यापेक्षा लोकसंख्येने अधिक आहात. केवळ १५ मिनिटे पोलिसांना हटवा, आम्ही सांगू कोणाच्यात किती हिंमत आहे. कोण शक्तीशाली आहे? या केलेल्या बेताल वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आले होते. मात्र न्यायालयाने ओवैसी यांची निर्दोश मुक्तता केली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121