लाल संविधान दाखवून कुणाला इशारा देताहात? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा राहूल गांधींना सवाल

    06-Nov-2024
Total Views | 126
 
Fadanvis
 
कोल्हापूर : लाल संविधान दाखवून तुम्ही कुणाला इशारा देत आहात? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस नेते राहूल गांधींना केला आहे. तसेच राहूल गांधी हे समाजात अराजकता तयार करण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांनी बुधवारी कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भारत जोडो या समुहामध्ये अनेक संघटना अतिशय डाव्या विचाराच्या आहेत. त्यांची ध्येयधोरणे आणि कामाची पद्धत ही अराजक पसरवणारी आहे. एकीकडे राहूल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. संविधानचा सन्मान केला पाहिजे. पण मग लाल संविधान का? लाल पुस्तक दाखवून तुम्ही कुणाला इशारा देत आहात?" असा सवाल त्यांनी केला.
 
ते पुढे म्हणाले की, "संविधान आणि भारत जोडोच्या नावाखाली अराजकता पसरवणाऱ्या लोकांना एकत्रित करून समाजात विद्वेष आणि अराजकता तयार करण्याचे काम सुरु आहे. अर्बन नक्षलवाद यापेक्षा काही वेगळा नाही. लोकांची मनं कलुषित करून त्यांच्यात अराजकतेचं रोपण करणे, जेणेकरून देशातील संस्थांवरचा त्यांचा विश्वास उडेल आणि देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण होईल, हा अर्बन नक्षलवादाचा अर्थ आहे. हेच काम राहूल गांधींच्या माध्यमातून होत आहे," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121