‘आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर निवडणूक लढवावी’

    29-Nov-2024
Total Views | 42
Jitendra Avhad

ठाणे : “जितेंद्र आव्हाड ( Jitendra Avhad ) यांना वाटत असेल की, ईव्हीएम मशीन हॅक होते आहे, तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर निवडणुकीला सामोरे जावे,” असे खडेबोल राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सुनावले. बॅलेट पेपरवर महाराष्ट्रातील पहिली निवडणूक मुंब्रा-कळवा विधानसभेमध्ये घेऊ. म्हणजे दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असा टोलाही त्यांनी आव्हाड यांना लगावला.

लोकसभेला महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रातील जनता ही महाविकास आघाडीच्या मागे मजबुतीने उभी आहे अशाप्रकारचा टाहो, महाविकास आघाडीचे सर्वच नेत्यांनी फोडला होता. मात्र, या निवडणुकीत महायुतीला जे अभूतपूर्व यश मिळाले ते नाकारण्याचा हा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने नाकारल्यानंतर ईव्हीएम हॅक झाल्याचा रडीचा डाव विरोधकांकडून सध्या सुरू आहे. त्यावर आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना खुले आव्हान दिले आहे.

आव्हाडांना वाटत असेल की, ईव्हीएम मशीन हॅक होते, तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर महाराष्ट्रातील पहिली निवडणूक ही मुंब्रा-कळवा विधानसभेमध्ये लढवावी, असे आव्हान आव्हाडांना दिले. दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेच्या बाजूने उभे राहून महाराष्ट्रातील जनतेने अजित पवार हेच राष्ट्रवादी विचाराचे व पक्षाचे खरे वारसदार असल्याचे दाखवून दिले आहे, असे मतही राष्ट्रवादी आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.

अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121