दिव्यांगांना करावे लागणार मोफत पासचे नूतनीकरण

    29-Nov-2024
Total Views | 50
Disable

नाशिक : महानगर परिवहन मंडळाकडून दिव्यांगांना देण्यात येणार्‍या मोफत पासचे ( Free Pass ) नूतनीकरण रविवार, दि. १५ डिसेंबर रोजीपासून करावे लागणार आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीत राहणार्‍या दिव्यांग प्रवाशांना मोफत प्रवास करता यावा यासाठी मोफत दिव्यांग कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही सुविधा दि. १ नोव्हेंबर २०२२ रोजीपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर दि. २५ ऑक्टोबर २०२३ रोजीपासून दिव्यांग प्रवाशांना साध्या कार्डऐवजी अद्ययावत आरएफआयडी कार्डचे वितरण करण्यात आले आहेत. या आरएफआयडी कार्डची मुदत मंगळवार, दि. ३१ डिसेंबर रोजी संपत असल्याने आता दिव्यांग प्रवाशांना आपले कार्डचे नूतनीकरण करून घ्यावे लागणार आहे. रविवार, दि. १५ डिसेंबर रोजीपासून आरएफआयडी कार्डचे नूतनीकरण करण्याची सुविधा सिटीलिंकच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आली असून दि. ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. याचा लाभ केवळ नाशिक महानगरपालिका हद्दीत राहणार्‍या दिव्यांग प्रवाशांनाच घेता येणार आहे. त्यामुळे आरएफआयडी कार्डचे नूतनीकरण करताना जुन्या कार्डसह रहिवासी पुरावा म्हणून आधारकार्ड, घराचे वीजबील, घरपट्टी यांपैकी कोणताही एक पुरावा सोबत असणे आवश्यक आहे. तसेच नूतनीकरण न करणार्‍या प्रवाशांना दि. १ जानेवारी २०२५ रोजीपासून कोणत्याही परिस्थितीत मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार नसल्याचे सिटीलिंककडून स्पष्ट करण्यात आले आहे. सिटिलिंक बससेवेच्या माध्यमातून ७ हजार, ७८२ दिव्यांग मोफत प्रवासाचा लाभ घेत आहेत. यापैकी २ हजार, २१९ दिव्यांग प्रवाशांकडून २०२४ या वर्षात नव्याने प्रवास करण्यासाठी मोफत पास काढण्यात आला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

(Tahawwur Rana's NIA Interrogation Begins) २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. गुरुवारी १० एप्रिलला रात्री राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाची १८ दिवसांची कोठडी दिली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता एनआयए मुख्यालयात चौकशीला सुरुवात झाली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121