काही तासांमध्ये राष्ट्रीय उद्यानातून पक्ष्यांच्या ७२ प्रजातींची नोंद; या दुर्मीळ प्रजातींची झाली नोंद

    27-Nov-2024
Total Views | 26
BNHS SGNP Bird Count



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) रविवार दि. २४ नोव्हेंबर रोजी 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त केलेल्या पक्षीगणनेमध्ये ७२ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे (BNHS SGNP Bird Count). सकाळच्या सत्रात केवळ काही तासांसाठी पार पडलेल्या पक्षीनिरीक्षणाद्वारे ७२ प्रजातींची नोंद होणे ही राष्ट्रीय उद्यानाची जैवविविधता अधोरेखित करते. (BNHS SGNP Bird Count)


'बीएनएचएस'कडून 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त दीर्घकालीन पक्षीगणनेचे काम सुरू आहे. 'सिटीझन सायन्स' उपक्रमाच्या धर्तीवरील या प्रकल्पाअंतर्गत पक्षीनिरीक्षक आणि निसर्गप्रेमी नागरिक मिळून पक्षीगणनेचे काम करतात. या गणनेअंतर्गत राष्ट्रीय उद्यानात आढळणाऱ्या पक्ष्यांची अद्यावत यादी तयार करण्यात येत आहे. दर महिन्याला पक्षी गणनेचे काम केले जाते. या महिन्यात हा उपक्रम २४ नोव्हेंबर रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यामध्ये पार पडला. यामध्ये ४७ स्वयंसेवक पक्षीनिरीक्षकांनी सहभाग नोंदवला होता.
या गणनेअंतर्गत पक्ष्यांच्या एकूण ७२ प्रजातींची नोंद करण्यात आली. माशीमार (फ्लायकॅचर) पक्ष्यांच्या सहा प्रजाती, वटवट्या (वॅबलर) पक्ष्यांच्या पाच प्रजाती आणि हळद्याच्या (ओरिअल) व सुतार पक्ष्याच्या प्रत्येक तीन प्रजातींची नोंद करण्यात आली. तसेच फार क्वचितच दिसणाऱ्या रान धोबी या पक्ष्याची देखील नोंद करण्यात आली. या सारख्या उपक्रमामधून नोंदविण्यात येणारी पक्ष्यांची जैवविविधता ही पुढील संशोधनाला बळकटी देण्याबरोबरच लोक आणि निसर्ग यांच्यातील सखोल संबंध वाढवण्यासाठी मदत करत असल्याचे मत 'बीएनएचएस'चे संचालक किशोर रिठे यांनी मांडले आहे. यासारखे उपक्रम आपल्या नैसर्गिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी लोकांना प्रेरणा देतात. त्यामुळे लोकांनी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन संवर्धनासाठी मदत करण्याचे आवाहन रिठे यांनी केले आहे
अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

(Tahawwur Rana's NIA Interrogation Begins) २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. गुरुवारी १० एप्रिलला रात्री राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाची १८ दिवसांची कोठडी दिली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता एनआयए मुख्यालयात चौकशीला सुरुवात झाली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121