"तर याचा करेक्ट कार्यक्रम.....”, अमोल मिटकरींची रोहित पवारांवर खोचक टीका

    25-Nov-2024
Total Views | 135
 
amol mitkari
 
मुंबई : (Amol Mitkari on Rohit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दि. २५ नोव्हेंबर रोजी कराड येथील प्रीतीसंगमावर जाऊन महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी अजित पवार व कर्जत जमखेडचे आमदार रोहित पवार यांची भेट झाली.या भेटीवेळी अजित पवार रोहित पवारांना “शहाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं. दर्शन घे काकांचे” असं मिश्कीलतेने म्हणाले. त्यानंतर रोहित पवारांनी अजित पवारांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला.
 
दरम्यान, अजित पवारांनी कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये रोहित पवारांच्या विरोधात उभे राहिलेले भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली असती, एखाद्या सभेला संबोधित केलं असतं किंवा प्रचार केला असता तर रोहित पवार पराभूत झाले असते असं स्वतः राम शिंदे म्हणाले आहेत. यावर रोहित पवार म्हणाले, “कदाचित उलटा निकाल लागला असता. मात्र, अजित पवार बारामतीत अडकून पडले होते”.
 
शरद पवारांनी अजित पवारांविरोधात घरातील उमेदवार (युगेंद्र पवार) दिला होता. तसेच प्रचारासाठी ते स्वतः मैदानात उतरले होते. त्यामुळे अजित पवारांना यावेळी राज्यातील इतर मतदारसंघांपेक्षा बारामतीमध्ये अधिक लक्ष द्यावं लागलं, यावरून रोहित पवारांनी अजित पवारांना चिमटा काढला.
 
रोहित पवारांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मिटकरी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत म्हटलं आहे की “दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोर नतमस्तक झाल्यावर हा (रोहित पवार) किती खोटं बोलतोय. बारामतीमध्ये पाय धरून काका माझ्या मतदारसंघात येऊ नका ही विनंती करुन, आज मस्तीत बोलतोय. जय पवार, पार्थ पवार यांच्यापैकी कोणी एक जरी कर्जत-जामखेडमध्ये फिरला असता तरी याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता. खोटारडा!” असं म्हणत खोचक टोला लगावला आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121