"थोडक्यात वाचलास! मी सभा घेतली असती तर..."; अजितदादा-रोहित पवारांची अचानक भेट

    25-Nov-2024
Total Views | 69
 
Ajit Pawar
 
सातारा : थोडक्यात वाचलास, मी सभा घेतली असती तर काय झालं असतं, असा मिश्कील टोला अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार आणि रोहित पवार प्रीतीसंगमावर गेले होते. यावेळी अचानक त्यांची भेट झाली.
 
रोहित पवार अजितदादांच्या समोर येताच ते म्हणाले की, "बच गया. काकांचं दर्शन घे. शहाण्या थोडक्यात वाचलास. माझी सभा झाली असती तर काय झालं असतं?" दरम्यान, रोहित पवारांनी अजितदादांना वाकून नमस्कार केला.
 
त्यानंतर रोहित पवार एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, "माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो. आता थोडी विचारांमध्ये भिन्नता आहे. पण शेवटी ते वडीलधारे व्यक्ती आहेत. २०१९ च्या निवडणूकीत त्यांनी मला खूप मदत केली होती. शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणे ही आपली संस्कृती आहे. त्यांची सभा झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वरखाली झालं असतं. उलटही होऊ शकलं असतं. पण ते बारामतीत इतके अडकून पडले होते की, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही," असे ते म्हणाले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121