छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासाठी १००% टक्के मतदान करा!
गोविंददेव गिरी महाराजांचे हिंदूंना आवाहन
13-Nov-2024
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Govinddev Giri Maharaj appeal for voting) "छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते स्वराज्य टिकवायची जबाबदारी आता आपली आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासाठी १०० % टक्के मतदान करा!", असे आवाहन समस्त हिंदू बांधवांना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचे महत्त्व जाणून घेता त्यांनी एका व्हिडिओद्वारे मतदारांना हे आवाहन केले आहे.
हिंदूंना उद्देशून पुढे ते म्हणाले, "आपण आपल्या पुढल्या पिढ्यांना कशाप्रकारचे राज्य देणार आहोत? आपले राज्य हे स्वराज्यासोबत सुराज्यही असलं पाहिजे आणि समर्थ हिंदूराष्ट्र असलं पाहिजे. या दृष्टीने आपल्याला सर्वात आधी उपयोग केला पाहिजे तो लोकशाहीतील सर्वात महत्त्वाच्या शस्त्राचा, म्हणजे आपल्या मताचा. छत्रपती शिवरायांची स्वप्नं पूर्ण करण्याकरीता आता संघटित होण्याची वेळ आली आहे."