शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म पवार साहेबांचंच! छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

    13-Nov-2024
Total Views | 169
 
Bhujbal & Pawar
 
मुंबई : शिवसेना फोडण्याचे पुण्यकर्म शरद पवार साहेबांनीच केले. त्यांनी तेव्हा हे काम केले नसते तर ही फाटाफूट झालीच नसती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. २००४ मध्ये भुजबळांकडे नेतृत्व दिले असते तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती, असे वक्तव्य शरद पवारांनी केले होते. यावर प्रत्युत्तर देताना भुजबळांनी तेव्हाचा घटनाक्रमच सांगितला.
 
छगन भुजबळ म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरेंनी मला शिवसेनेत असताना नगरसेवक, महापौर आणि आमदार केले. यासाठी मी अनेकदा त्यांचे आभारसुद्धा मानले. परंतू, शरद पवार साहेबांनी आता या सगळ्या गोष्टी बोलण्याची आवश्यकता नव्हती. १८-२० आमदारांना शिवसेनेतून बाहेर काढण्याचे आणि शिवसेना फोडण्याचे पुण्यकर्म पवार साहेबांनीच केले. त्यांनी तेव्हा हे काम केले नसते तर ही फाटाफूट झालीच नसती. शिवसेनेत असताना मी पहिल्या दिवसापासून काम केले. माझ्यात काहीतरी असेल तेव्हाच बाळासाहेबांनी मला एवढी पदे दिली. परंतू, आता या सगळ्या गोष्टीला आणि शिळ्या कढीला उत येण्याचे काही कारण आहे असे मला वाटत नाही. निवडणूकीमध्ये एखाद्याला बदनाम करण्यासाठी या मुद्दांवर ते बोलत आहेत. खरंतर या सगळ्या गोष्टी मला बोलायच्या नव्हत्या. पण आता त्यांनीच बोलायला सुरुवात केली आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  बॅग तपासणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याला ठाकरेंची धमकी! आयोगाने कारवाई करावी
 
ते पुढे म्हणाले की, "२००४ ला भुजबळांना मुख्यमंत्री का केले नाही? याबद्दल ते बोलले. पण ठीक आहे. त्यांना मला मुख्यमंत्री करायचे नव्हते. परंतू, अजितदादा होते, आर. आर. पाटील होते. त्यांना तरी करायचं होतं. पवार साहेबांनी एकदा सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री केले होते. त्यानंतर एक-दोन वर्षांनी सुधाकरराव नाईक आणि पवार साहेबांचे टोकाचे मतभेद झालेत. आपण कुणाला मुख्यमंत्री केल्यास ते आपल्या वरचढ होतात. त्यामुळे कुणालाच न केलेलं बरं, असे पवारांना वाटत असावे. म्हणूनच त्यांनी ना अजितदादांना, ना आर. आर. पाटलांना आणि ना छगन भुजबळांना, कोणालाही मुख्यमंत्री केले नाही," असा गौप्यस्फोट भुजबळांनी केला आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121