१५ मिनिटांचे एकच उत्तर १०० टक्के मतदान! संभाजीनगरच्या मतदारांनी दिलं चोख प्रत्युत्तर

भव्य फलक लावत केले मतदारांना आव्हान

    13-Nov-2024
Total Views | 45

Akbaruddin Owaisi
 
संभाजीनगर : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम आहे. विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. अशातच सध्या संभाजीनगर येथे एका बॅनरची चर्चा आहे. संभाजीनगर येथे भाजप विरूद्ध एमआयएममध्ये टक्कर आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजीच्या माध्यमातून १५ मिनिटांचे शंभर टक्के मतदान करा असे उत्तर देण्यात आहे. अकबरूद्दीन ओवैसींनी केलेल्या एका विधानावरून हे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 
 
छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात बॅनर लावण्यात आला आहे. एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी पंधरा मिनिटे द्या, सर्व बहसंख्य असलेल्यांचा सुपडासाफ करतो अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. काही दिवसांआधी संभाजीनगर येथे ओवैसी यांची सभा झाली होती त्या सभेमध्ये त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून बॅनरबाजी केली आहे. मात्र हा बॅनर कोणी लावला आहे त्याची अद्यापही माहिती आता समोर आलेली नाही.
 
संभाजीनगर पूर्व येथे छत्रपती संभाजीनगर हे निवडणुकीच्या रिंगणात असून भाजपकडून अतुल सावे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात काँटे की टक्कर असणार आहे. अशातच आता या बॅनरकडे अनेकांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121