धारावीत 'गायकवाड हटाओ, धारावी बचाओ'च्या घोषणा

आगीची दुर्घटना घडल्याने नागरिक संतप्त ; आम्हाला धारावीचा विकास हवा ! म्हणत नागरिकांनी दिल्या घोषणा

    10-Nov-2024
Total Views | 48

dharavi

मुंबई, दि.११ : प्रतिनिधी 
'ज्योती गायकवाड चाले जाओ'चा नारा देत धारावीकरांनी काँग्रेसच्या उमेदवार ज्योती गायकवाड यांच्या विरोधात घोषणा दिल्या. धारावीच्या विजयानगर परिसरात आगीची दुर्घटना घडली. या दुर्घटनास्थळी भेट देण्यासाठी आल्या असता धारावीतील नागरिकांनी पुनर्वसन प्रकल्पाला विरोध करणाऱ्या गायकवाड कुटुंबाविरोधात रोष व्यक्त केला.

दरम्यान, शुक्रवार दि.८ रोजी रात्रीच्या सुमारास धारावीच्या विजयानगर येथील संक्रमण शिबिराजवळ आगीचा भडका उडाला. चिंचोळ्या गल्ल्यांमधून अग्निशमन दलाला या परिसरात आग विझविण्यासाठी यायला जागाही नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशावेळी संतापात नागरिकांनी या घटनास्थळी भेट देण्यासाठी आलेल्या काँग्रेसच्या विधानसभा उमेदवार आणि खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड यांच्या विरोधात घसोहन दिल्या. पुनर्वसन प्रकल्पाला विरोध करणाऱ्या 'ज्योती गायकवाड वापस जाओ'च्या घोषणा यावेळी उपस्थितांनी दिल्या. याचा एक व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल झाला आहे.

धारावीतील या संक्रमण शिबिरातील रहिवासी राजू चौबे म्हणतात,"इथे एवढी मोठी आग लागली आहे. इथे माझे घर आहे परिवार आहे. या आगीमुळे माझा परिवार, लहान मुलं आणि आजूबाजूचे नागरिक घाबरले आहेत. इथे अग्निशमनची गाडी देखील येऊ शकत नाही. आमचे जीव धोक्यत आहेत. गाडी यायला आणखी १५ मिनिटे उशीर झाला असता तर हा ट्रान्झिट कॅम्प पूर्ण जाळून खाक झाला असता.हे धारावी बचाव नाही धारावीत आगी लावा असे काँग्रेसचे आणि गायकवाड परिवाराचे व्हिजन आहे. मागील ४० वर्षांपासून गायकवाड परिवाराने धारावीचा विकास होऊ दिला नाही. आम्हाला राजकारणं करायचे नाही मात्र आमच्या बालकांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला धारावीचा विकास हवा आहे," अशी तीव्र भावना या रहिवाशाने व्यक्त केली.

पुढे चौबे म्हणाले,"इथे कशाला, तमाशा बघण्यासाठी आले आहात? इतकावेळ कुठे होते हे लोक? सर्व बचावकार्य स्थानिकांनी आणि इथल्या नागरिकांनी सुरु केले. कोणाचा मृत्यू झाला असता तर केवळ शोक व्यक्त करायला आले असते. यांना धारावीकरांचा सौदा करून केवळ स्वतःच्या तिजोऱ्या भरायच्या आहेत. धारावीचा विकास अडाणी करत आहेत की अंबानी याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही. आम्हाला आमच पक्के घर हवं आहे. मात्र हा विकास रोखणारा काँग्रेसचा गायकवाड परिवार आहे", अशा संतप्त प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केल्या.
अग्रलेख
जरुर वाचा
मध्य प्रदेशात हनुमान जयंती मिरवणुकीत जमावाकडून हिंदूंवर दगडफेक, नऊ जण पोलिसांच्या ताब्यात

मध्य प्रदेशात हनुमान जयंती मिरवणुकीत जमावाकडून हिंदूंवर दगडफेक, नऊ जण पोलिसांच्या ताब्यात

Hanuman Jayanti मध्यप्रदेशातील गुना शहरातील हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणात संबंधित पोलिसांनी नऊ जणांना अटक केली होती. यावर अधिकाऱ्यांनी रविवारी १३ एप्रिल २०२५ रोजी माहिती दिली आहे. यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना कर्नलगंज येथे असलेल्या मशि‍दीच्या भोवताली घडली आहे. सायंकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी दोन्ही गट एकमेकांसमोर आले. यावेळी अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ते घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121