“१४ वर्षांचा अपत्यप्राप्तीसाठीचा वनवास यंदाच्या दिवाळीत संपला”, तेजस्विनी पंडित झाली मावशी

    01-Nov-2024
Total Views | 200
 
teajswini pandit
 
 
मुंबई : अभिनेत्री-निर्माती तेजस्विनी पंडित सध्या तिच्या ‘येक नंबर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची ती निर्माती तर होतीच पण त्यात तिने उत्तम भूमिका देखील साकारली होती. अशातच दिवाळीच्या मुहूर्तावर तेजस्विनी पंडितने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तेजस्विनी मावशी झाली आहे. तेजस्विनीची बहिणी पूर्णिमा पुलन आई झाली असून तिने एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला आहे. या चिमुकलीबरोबरचे खेळतानाचे फोटो शेअर करून तेजस्विनीने मावशी झाल्याचं जाहीर केलं आहे. तेजस्विनीच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
 
तेजस्विनीने पोस्टमध्ये लिहिले आहे की, झ्यासाठीची सगळ्यात ‘मोठी’, सगळ्यात ‘खास’ आणि आयुष्यभराची ‘दिवाळी भेट’ माझ्या बहिणीने आणि दाजींने मला दिली आहे. आमच्या घरात ‘लक्ष्मी’ आली! अनेक वर्ष ह्या सुखाचा अनुभव घेण्यासाठी आम्ही सर्वच आसुसलेले होतो. माझ्या माणसांच्या आयुष्यातला १४ वर्षांचा अपत्यप्राप्तीसाठीचा वनवास यंदाच्या दिवाळीत संपला. त्या हॉस्पिटलच्या फेऱ्या, तिथली धावपळ, अचानक उद्भवलेले अडथळे या सगळ्यात आजूबाजूला सणाचे वातावरण आहे हे विसरायला झालं होतं पण या सगळ्यावर मात करत आमचे दिवाळीचे क्षण च नव्हे तर आयुष्य देखील या ‘कन्यारत्नाने’ उजळून टाकले! आमच्या कुटुंबाची “कथा” सुफळ संपूर्ण म्हणुया? ही दिवाळी माझ्यासाठी एकदम खास आहे, मी मावशी झालेय! होऊ दे खर्च. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ! शुभ दीपावली ! शुभं भवतु
 

teajswini pandit  
अग्रलेख
जरुर वाचा
तुला घाबरण्याची गरज नाही..., शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे..